शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
2
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
3
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
4
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
6
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
7
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
8
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
9
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
10
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
11
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
12
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
13
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
14
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
15
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
16
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
17
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
18
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
19
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
20
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 2:21 PM

राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १० जणांना बियाणे दिले बदलून; ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता

सातारा : राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले. उर्वरित ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता असून, यात सर्वाधिक तक्रारी कऱ्हाड तालुक्यातील आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र ३ लाख हेक्टरहून अधिक आहे. सोयाबीन, भात, बाजरी आणि ज्वारी ही पिके या हंगामात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. तर खरिपात सोयाबीनचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास आहे. बहुतांशी शेतकरी या खरीप हंगामावरच अवलंबून असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने हा हंगाम महत्त्वाचा ठरतो. खरिपात शेतकऱ्यांची बियाणे आणि खताबाबत फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. या अंतर्गत कृषी दुकानांची तपासणी करून कारवाईही करण्यात आली आहे.मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली होती. सोयाबीनचीही पेरणी सुरू आहे. पण, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. आतापर्यंत ६१ तक्रारी आल्या असून, यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक ३३आहेत. साताऱ्यांतील १७ आहेत. तर वाई तालुक्यातून १० तक्रारी आल्या.

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार येताच कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून माहिती घेतली. त्यातील १० जणांना बियाणे बदलून देण्यात आले आहेत. पूर्वी घेतलेल्या दुकानातूनच हे बियाणे कृषी विभागाने मिळवून दिले.

५१ तक्रारीबाबत सबंधित कंपनी कार्यालयाला प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर चार ठिकाणच्या केसेस कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.खोलीवर बियाणे...उन्हाळा झाल्यानंतर यावर्षी लवकर पाऊस झाला. शेतकऱ्यांनी आणखी पावसाची वाट न पाहता सोयाबीनची पेरणी केली. असे असलेतरी उष्णतेत सोयाबीन उगवत नाही. त्यामुळे उगवण नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला आल्या. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या ठिकाणचे बियाणे खोलवर गेले. तेथील बियाणे उगवणीला मार बसला. पण, बैलांच्या साह्याने पेरणी झालेल्या ठिकाणी सोयाबीन उगवण चांगली झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर