शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

जिल्ह्यात ६६८ संस्थात्मक विलगीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील गृहविलगीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील गृहविलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण सुरू केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ६६८ नवीन संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. अनेक गावांमध्ये विलगीकरण केंद्रे तयार झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील १४९६ गावांपैकी ४६४ ग्रामपंचायती पूर्णपणे कोरोनामुक्त आहेत. या गावांमध्ये संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष उपाय योजना जिल्हा प्रशासन राबवत आहे. रुग्णालयाच्या आवारात असणारी लसीकरण केंद्रे आता बंद करण्यात येणार असून, इतरत्र सुरू करण्यात येणार आहेत,

जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याच्या अनुषंगाने वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. ऑक्सिजन निर्मिती करण्यासोबतच ज्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला आहे, त्यांचे ऑडिट करण्यावर प्रशासनाने भर दिलेला आहे. संभावित तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होतील, असा अंदाज शासनाने व्यक्त केला असल्याने रुग्णालयांमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आठ वॉर्ड राखीव ठेवलेले आहेत.

दरम्यान, लसीकरण मोहिमेची तयारीदेखील आपण चांगल्या पद्धतीने केली आहे. या महिन्यात जिल्ह्यासाठी ३८ हजार इतक्या लस उपलब्ध झाल्या होत्या. लसींचा पुरवठा चांगल्या पद्धतीने सुरू राहिला तर लसीकरण मोहीमदेखील चांगल्या पद्धतीने राबविता येणार आहे.

जे लोक तपासणीनंतर कोरोनाबाधित आढळत आहेत, अशा लोकांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारणे बंद झाले आहे. असे बाधित रुग्ण लोकांमध्ये मिसळत असल्याने संसर्ग वाढत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला. जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष या भागामध्ये दिले. संस्थापक विलगीकरण केल्यानंतर हा प्रश्न राहणार नाही. मात्र, शहरामध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. जे बाधित आढळतील, त्यांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्केदेखील मारले जातील तसेच शहरांमध्ये सुद्धा नवीन आयसोलेशन कक्ष उभारणीच्या अनुषंगाने प्रशासन प्रयत्न करीत आहे.

चौकट..

कुटुंब प्रमुख गमावलेल्या लोकांना वीस हजारांची मदत

तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबांना शासनातर्फे २० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. अशा कुटुंबांची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

पालक गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासनातर्फे मदत दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या पातळीवर आपण विशेष निर्णय घेऊन तरी एक पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडला असेल तरी त्याच्या पाल्याला ११०० रुपये दिले जातील. याची माहिती घेण्याचे काम जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.

रुग्णांनी दोन तपासण्या करू नयेत..

रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये जर रुग्ण बाधित आढळला, तर त्या रुग्णांनी आरटीपीसीआर तपासणी करण्याची गरज नाही. रॅपिड अँटिजन टेस्ट प्रभावी आहे. एका रुग्णाने दोन तपासण्या केल्यानंतर देखील रुग्णसंख्या वाढलेली दिसते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.