शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

By नितीन काळेल | Published: April 19, 2023 7:45 PM

वळवाने २१ कुटुंबांना केले बेघर..

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सतत जोरदार वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती पिके आणि फळबागांचे कोटीत नुकसान झाले. गेल्या १० दिवसांत तर जिल्ह्यातील २१ कुटुंबांना वळवाने बेघर केले. तसेच ७ जनावरांचा मृत्यू झाला असून वीज पडून एक शेतकरीही ठार झाला आहे.

जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी महिन्यानंतर अवकाळी आणि वळवाचा पाऊस पडतो. यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. याचा फटका तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झालेले. यातून बळीराजा सावरत असतानाच एप्रिल महिन्यात वळवाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवसांत तर ८ वेळा जोरदार वाऱ्यासह वळीव जिल्ह्यात कोठे ना कोठे बरसला आहे. त्यातच गारपीट होत आहे. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. तर वाऱ्यामुळे घरे, शाळांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. तसेच वीज पडूनही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिलपासून आतापर्यंत वळवाच्या पावसाने २१ घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक १० घरांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यात ७, फलटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी दोन घरे बाधित झाली आहेत. त्याचबरोबर लहान ३ आणि मोठ्या चार जनावरांचा मृत्यू झालाय. यातील ५ जनावरांचा खटाव तालुक्यात तर वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर जावळी तालुक्यात पावसामुळे ७ कोंबड्यांचाही मृत्यू झालाय. तर कोरेगाव तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.यावर्षी अवकाळीपेक्षा आताच्या वळवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये पिके, फळबागा आणि पशुधनाचाही समावेश आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

वळवात फळबागांचेच अधिक नुकसान...जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचा समावेश अधिक होता. कारण, त्याचवेळी शेतकऱ्यांची पीक काढणी आणि मळणी सुरु होती. त्यामुळे बाधित शेतकरी अधिक आणि नुकसान कमी राहिले. पण, आता वळवात पिकांपेक्षा फळबागांचे नुकसान अधिक झाले आहे. फळबागांचे नुकसान अधिक राहते. तसेच शासनाकडून मदतही पिकांपेक्षा जादा मिळत असते.

टॅग्स :satara-acसाताराFarmerशेतकरी