शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:02 PM

२४ तासांत नवजालाच १९ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असून, २४ तासांत नवजा येथेच सर्वाधिक १९ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्याने ९० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे.जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला हाेता. त्यामुळे पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. तर पूर्व भागात दमदार पाऊस झाल्याने छोट्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला होता. यामुळे दुष्काळाची स्थिती निवळली. पण, जुलै महिना उजाडल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. जुलैच्या मध्यावर सुरू झालेला पाऊस महिना संपेपर्यंत सुरूच होता. या काळात पश्चिमेकडील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात अतिवृष्टी होती. जवळपास १२ दिवस पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या अतिवृष्टीमुळे छोटे पाणी प्रकल्प भरून वाहिले. तर कोयनेसह प्रमुख मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही धरणे ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरली आहेत. त्यामुळे धरणाबद्दलची चिंता कमी झाली आहे. अजूनही पावसाचा दीड महिना बाकी आहे. त्यामुळे धरणे भरू शकतात. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप आहे.जिल्ह्यात मागील १२ दिवसात कमी पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून तर उघडीप आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९, नवजाला १९ आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटर पर्जन्यमनाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातही सावकाश आवक आहे. सकाळच्या सुमारास सुमारे साडेसात हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. पाऊस कमी झाल्यापासून कोयनेतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

नवजाला ५,०७४ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. १ जूनपासून नवजा येथे ५ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झाली, तर कोयनानगरला ४ हजार २८० आणि महाबळेश्वरमध्ये ४ हजार ८३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी नवजाचा पाऊस सहा हजारांपर्यंत, तर महाबळेश्वरला पाच हजार मिलिमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस