शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

मायणी ग्रामपंचायतीकडून तीन विहिरी अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:26 AM

मायणी : मायणी गावास येरळवाडी मध्यम प्रकल्पातून असलेल्या प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित झाल्याने गावातील उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई ...

मायणी : मायणी गावास येरळवाडी मध्यम प्रकल्पातून असलेल्या प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित झाल्याने गावातील उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती, ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तीन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, या विहिरीतून उपनगरांना पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शेती वीज वेळापत्रक पत्रकानुसार वीजपुरवठा काही दिवस रात्री व काही दिवस दिवसा असल्याने थोड्याफार अडचणी येत आहेत.

मायणी गावास पाणीपुरवठा करण्यासाठी येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, या योजनेचे प्रचंड वीजबिल येत असल्याने या योजनेची थकबाकी तीन कोटींवर गेली आहे. वीजवितरण कंपनीने या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा वीजपुरवठा थकीत बिलाचे कारण दाखवून बंद केला.

त्यामुळे मायणी गावातील वडूज रोड, मरडवाक रोड, नदाफ कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी, श्रीराम कॉलनी, मोराळे रोड, यशवंतनगर, शिक्षक कॉलनी, सराटे मळा यांसह कचरेवाडी व फुलेनगर परिसरातील उपनगरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच रोजच्या वापरण्यासाठी ऐन पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये पाणी ग्रामस्थांना देता येत नसल्याने ग्रामपंचायतीवर ही थोडी नामुष्की ओढवली होती.

यावर मार्ग काढण्यासाठी मायणी ग्रामपंचायतीमार्फत येथील मरडवाक रोडलगत असलेले शेतकरी पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांच्या स्वमालकीच्या विहिरी गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी अधिग्रहण केल्या. या विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ पाईपलाईन जोडून यातून या उपनगरांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे पाणी देत असताना विहिरीवरील वीज शेतीपंपाची असल्याने आठवड्यातील काही दिवस रात्रीच्या वेळी वीजपुरवठा असतो, तर काही दिवस दिवसा वीजपुरवठा असतो, त्यामुळे पाणी देण्याचे वेळापत्रक बसवताना ग्रामपंचायतीला प्रचंड अडचण निर्माण होत आहे.

चौकट..

सुरळीत पाणीपुरवठा केल्याने संकट टळले..

विहिरीतून थेट पाणी पाईपलाईनद्वारे दिले जात असल्याने पुरेसा दाब नसल्याने संपूर्ण उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असतानाही ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अशा प्रकारे तातडीने निर्णय घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केल्यामुळे ग्रामस्थांचे तूर्तास पाणीसंकट टळले आहे.

चौकट -

शेतकऱ्यांकडून विनामोबदला पाणीपुरवठा

प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे येथील पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांनी स्वमालकीच्या विहिरीतील विनामोबदला ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व ग्रामस्थांकडून यांचे कौतुक होत आहे.