शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

साताऱ्यात प्रशासन अलर्ट! ३६९ कुटुंबांचे स्थलांतर; पश्चिमेकडील गावांत सतर्कता, NDRFची टीम येणार

By नितीन काळेल | Published: July 20, 2023 7:43 PM

अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे.

सातारा: अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे. साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात हलिवण्यात आले असून अन्न, शुध्द पाण्यासह महत्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच दोन दिवसांत जिल्ह्यात एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून सूचना केली. यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून जात आहेत. दरडी कोसळू लागल्याने प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करावे अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटण तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन आढावा घेतलेला आहे. तसेच तेथील अधिकाऱ्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.

या पार्श्वभूमिवर सध्या जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. यामध्ये पुढे आणखी वाढ होणार आहे.

स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती...

  • सातारा तालुका : मोरेवाडीतील १८, सांडवालीतील २० आणि भैरवगडमधील ६० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
  • जावळी तालुका : बोंडारवाडी ६, भुतेघर येथील ३ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. तसेच नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढामधील नागरिकांना स्थलांरित होण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
  • वाई तालुका : जोर गाव ८, गोळेगाव-गोळेवस्ती येथील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.
  • पाटण तालुका : मिरगाव, हुंबरळी आणि ढोकावळे येथील १५० कुटुंबाचे तर म्हारवंडमधील ३५ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.
  • महाबळेश्वर तालुका : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येथील ६५ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यात धोकादायक दरडप्रवण ४१ गावे...

  • महाबळेश्वर तालुका : येरणे बुद्रुक, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा, एरंडल, धावली, दुधोशी, भेकवलीवाडी, आचली, कुमठे (कामटवाडी)
  • पाटण तालुका : आंबेघर तर्फ मरळी खालचे, आंबेघर तर्फ मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहीर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी (धावडे), जितकरवाडी (जिंती), धनवडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), बागलेवाडी, जुगाईवाडी, कुसावडे (पळसरी).
  • वाई तालुका : कोंढावळे, जोर.
  • जावळी तालुका : बोंडापरवाडी, भुतेघर, वहिटे.
  • सातारा तालुका : सांडवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी)

जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर दरडप्रवण भागातील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यांना अन्न, पाणी तसेच आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या पाऊस होत असल्याने दरडप्रवण भागात नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच प्रशासनासही सहकार्य करावे. लवकरच एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारीst जितेंद्र डुडी यांनी दिली. 

टॅग्स :satara-acसाताराRainपाऊस