शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

नेत्यांनंतर आता पदाधिकारी हमरीतुमरीवर!

By admin | Published: December 14, 2015 8:38 PM

रंगतोय कलगीतुरा : पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर गटाचा भडक्यामुळे राजकीय वातावरण ढवळले

पाटण : पाटण तालुक्यात सदा सर्वकाळ देसाई आणि पाटणकर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय सवाल-जवाब सुरू असतो. हे सर्वज्ञात आहे. याचा पुळका मात्र आता दोन्ही बाजंूकडील पदाधिकाऱ्यांकडून खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करण्यापर्यंत मजल गेली आहे. पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुऱ्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘नेत्याची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली...’ अशी चर्चा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहे.ढेबेवाडी विभागात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांना उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, ‘सरदार सर्वसामान्य जनतेच्या पंगतीला बसत नाही. मी मात्र, लोकांच्या मांडीला मांडी लावून जेवण करतो.’ यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मोठी ठिणगी पडली. तर कोयना विभागातील बोपोली गावात झालेल्या रस्ता भूमिपूजनप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांवर थेट टीका केली. या टिकेला उत्तर देताना कोयना विभागातील पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या देसाई गटाने विद्यमान उपसभापती डी. आर. पाटील यांना मैदानात उतरवले. ‘राजाभाऊ शेलार हे पाटणकरांची चमचेगिरी करतात. केवळ पदासाठी नेत्यांच्या मागे लागणारा कार्यकर्ता आहे,’ अशी टीका डी. आर. पाटील यांनी केली. त्याला उत्तर देताना मुंबईच्या शेठला पाटणमध्ये आणून ‘पैशांच्या जोरावर निवडून आणले.या मुंद्रूळकोळे विभागाच्या सदस्याला चिठ्ठीवर उपसभापती पद मिळाले. आमदार देसाई यांनी चमचेगिरी कशी करावी, हे शिकवू नये’ असे प्रतित्तत्तर राजाभाऊ शेलार यांनी दिले. या कलगीतुऱ्यामुळे ‘नेत्यांची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली’ याचा प्रत्यय जनतेला येऊ लागला आहे. हा वाद आणखी काही दिवसांत आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)भूकंपग्रस्त दाखल्यांसाठी श्रेयवादभूकंपग्रस्त दाखल्यांसाठी आमदार देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर गटांचे बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, निकाल लागला आहे. दोन्ही याचिकांवर न्यायालयाने एकच निकाल दिला आहे. यावरून आमदार शंभूराज देसाई अन् विक्रमसिंह पाटणकर या दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.