शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

"जुने मुद्दे काढणे ही फालतुगिरी"; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

By नितीन काळेल | Published: April 09, 2023 6:17 PM

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले.

सातारा : ‘सध्या जुने मुद्दे काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. यामुळे बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का? आता त्यांच्याकडे महत्त्वाचे मुद्देच राहिले नाहीत, ही तर फालतुगिरी आहे,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर ट्वीटच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर द्यायला बांधिल आहे का, त्याने अंगाला भोके पडतात का? असा प्रश्नही उपस्थित केला.

सातारा जिल्हा दाैऱ्यावर रविवारी अजित पवार होते. साताऱ्यातील जिल्हा बॅंकेतील कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. या कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘महत्त्वाच्या व्यक्तीने काय वक्तव्य केले तर त्याबद्दल मत व्यक्त करावे लागते. कारण, मत व्यक्त केले नाही तर लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण होतात. त्याबद्दल उत्तर द्यायला बांधिल आहे. पण, रोजच हाैसे, गवसे ट्वीट करणार. त्याच्या बातम्याही येणार म्हणून काय उत्तर द्यावे एवढेच काम नाही.

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, टाटा, बिर्ला यांनी उद्योगाचा पाया रचला. लोकांना रोजगार दिला. त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाला. अंबानी आणि अदानींनीही तसेच केले. आता अदानींबाबत समिती नेमण्यात येणार आहे. समिती नेमल्यानंतर वस्तूस्थिती समोर येईल. पण, आपण लगेच कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो हेही बरोबर नाही. अदानींमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे पाठिशी आहेत. तोपर्यंत काही होणार नाही.

राज्यात वळीव पावसामुळे नुकसान झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्री अयोध्या दाैऱ्यावर असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी ‘मुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. आम्हीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना करू, शकतो. मुंबईला गेल्यावर मुख्य सचिवांशी याबाबत बोलणार आहे. पण, श्रध्दा असल्याने आम्हीही कोणत्याही देवस्थानला जातो. काही लोक शिर्डी, जेजुरी, तिरुपतीला जातात. ज्यांना योग्य वाटते ते तसे जातात, असे स्पष्टीकरण दिले.जिल्हा बॅंकेचे काम चांगले...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य असणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आहे. या बॅंकेचे नेतृत्व आतापर्यंत दिग्गजांनी केले आहे. आता नितीन पाटील यांच्या रुपाने नवीन पिढी चांगले काम करत आहे, असे ग़ाैरवोद्गारही अजित पवार यांनी काढले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे