शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

घरांच्या भिंतींना पारंपरिक पद्धतीने झडपी बांधण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:42 AM

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ...

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टी, दाट धुके, अति थंडीमुळे घरातील उबदार वातावरणासाठी जुन्या, पारंपरिक पद्धतीने कोळंब गवताच्या झडपा बांधून पर्यावरणपूरक उपाययोजना सुरू आहे.

डोंगरमाथ्यावरील अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगड्यांच्या तुडुसाचा वापर करतात. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जुन्या, पारंपरिक कोळंब गवताच्या झडपी बांधल्या जातात. सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घरांच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून, काही ठिकाणी झडपा बांधण्याचे काम सुरू आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो. अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधली जातात. मे अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीस कामाला सुरुवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जातात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत तरव्याला वापरून खतासाठी वापरतात.

चौकट

ओलीपासून सुटका

पावसाच्या तडाख्यात भिंतीवरील पाणी या झडपीमुळे जमिनीपर्यंत येते. भिंती भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये तसेच थंडीच्या सुरक्षिततेसाठी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार घरांच्या भिंतींना बांधतात. याकामी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

कोट

पाऊस सुरू होण्याअगोदर घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी झडपी बांधतात. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरी भिंतींना लागत नाही. त्यामुळे भिंती कोरड्या, घरातील वातावरण उबदार राहते. सहसा या भागात प्लास्टीक कागद वापरला जात नाही. कारण त्याला खर्चही आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कागद फाटू शकतो. त्यामुळे शेतकरी गवताचीच झडपी बांधतात. याला खर्च नसला तरी मेहनत खूप आहे.

- कृष्णा आखाडे,

आखाडेमुरा, ता. जावली

कास पठारावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यापासून घराचे संरक्षण करण्यासाठी डोंगरमाथ्यावर घराच्या भिंतींना झडपी बांधण्यास वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण )