शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Satara: कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:25 IST

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना धरणातीलपाणीसाठा मे महिनाअखेर कमी झाला असला तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील बहुतांशी भागांत पाणीबाणी सुरू असताना राज्यातील तारणहार ठरलेल्या कोयना प्रकल्पाकडे पाणी मागणीचा भार वाढला होता. यादरम्यान कोयना धरणाच्या पायथा वीजगृह व नदी विमोचकातून कोयना नदीपात्रात गेले चार महिने अपवाद वगळता अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पूर्वेकडील कोयना, कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या भागाची तहान भागली व शेतीला उपयुक्त ठरले. ऐन दुष्काळजन्य स्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे वीजनिर्मितीसह कृष्णा, कोयना नदीकाठ जलसमृद्ध करत दुष्काळ भागांनाही दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोयना प्रकल्पाकडून झाले आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा असलेल्या कोयना धरणातील तब्बल ४४.२५ टीएमसी पाणी हे धरणातून पूर्वेकडे सिंचन व पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २१.९३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून जून महिन्यात जरी पावसाने दडी मारली तरी किमान १५ जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात आहे.कोयना धरणातील गत दोन वर्षे कोयना जलविद्युत प्रकल्पाने लवादाच्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर वीजनिर्मिती करून राज्याला वीज संकटातून वाचवले होते. चालू वर्षी तांत्रिक वर्ष संपायला पाच दिवस बाकी असताना लवादाने निर्धारित केलेला ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४.७६ टीएमसी इतकाच पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला. त्यामुळे चालू तांत्रिक वर्षात वीजनिर्मितीसाठीचा आरक्षित पाणीसाठा संपण्याची शक्यता कमी आहे.

पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग..-कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. कोयना धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणारे नदी विमोचक गेट चालू वर्षी दि. २० फेब्रुवारीला सुरू करण्यात आले होते. मार्च महिन्यातील दोन दिवस वगळता सलग सुमारे चार महिने सुरू होते.-रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने पाठ फिरवल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून ऑक्टोबर महिन्यात सुरू केलेला पाण्याचा विसर्ग काही अपवाद वगळता आजवर सुरूच आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी