शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

By नितीन काळेल | Updated: June 12, 2024 19:28 IST

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच 

सातारा : मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. सध्या १४८ टॅंकरवर १४१ गावे आणि ४५३ वाड्यांची तहान अवलंबून आहे. तरीही माणमधील अजुनही ४६ गावे आणि ३१४ वाड्यांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. तसेच जिल्ह्यातील एकाही तालुक्याने १०० टक्क्यांची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नव्हती. तसेच कोयना धरणातही कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा सुरू झाल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गहन झालेला. त्यामुळे अनेक गावांना टॅंकर सुरू होते. तर बहुतांशी गावांना मार्च महिन्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. त्यानंतर दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली.मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात तब्बल २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी २०८ टॅंकरचा धुरळा उडत होता. तर या टॅंकरवर २ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यामध्ये माणमध्येच टंचाई अधिक होती. तालुक्यातील ७१ गावे आणि ४४५ वाड्यांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. ८८ टॅंकरवर सवा लाख लोकांची तहान अवलंबून होती. यानंतर खटाव तालुक्यातही टंचाई वाढलेली. ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले. ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांना ४१ टॅंकरचा आधार होता. त्याचबरोबर फलटण तालुक्यातही ३३ टॅंकर सुरू होते. ४२ गावे आणि ११३ वाड्यांना पाणीपुरवठा होत होता.कोरेगाव तालुक्यातीलही ३३ गावांसाठी २६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. खंडाळा तालुक्यात २, वाईमध्ये ६ गावे आणि ५ वाड्या तसेच पाटण तालुक्यात २ गावे व ८ वाड्या आणि कऱ्हाड तालुक्यातील ७ गावांसाठी टॅंकर सुरू होते. मात्र, मागील आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने टंचाई एकदम कमी झाली आहे.जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत टंचाईची स्थिती आहे. त्यासाठी सध्या १४८ टॅंकर सुरू आहेत. यावर २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनाची तहान अवलंबून आहे. सध्या टंचाईची दाहकता अजुनही माण तालुक्यात आहे. माणमध्ये अजुनही ७० टॅंकर सुरू आहेत. तर खटाव तालुक्यात १७, फलटणला २५, कोरेगाव तालुक्यात २४, खंडाळा १, वाई तालुक्यात ७, जावळीत १ आणि कऱ्हाड तालुक्यात ३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

दुष्काळी तालुक्यात टंचाई कमी..जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि काेरेगाव या दुष्काळी तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, सध्या या तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे टंचाई कमी झालेली आहे. तसेच टॅंकरची संख्याही घटली आहे. सध्या माणमधील ४६ गावे आणि ३१४ वाड्या, खटावमध्ये २१ गावे व ४० वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तसेच फलटणला ३२ गावे आणि ९३ वाड्या आणि कोरेगाव तालुक्यातील २९ गावांसाठी टॅंकर सुरू आहे. पावसाने टंचाई कमी झाल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. तसेच खर्चही कमी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस