शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

पराभवानंतर न फिरकणाऱ्यांना जाब विचारा

By admin | Published: October 17, 2016 12:55 AM

शंभूराज देसार्इंचा पाटणकरांना टोला : ईबीसी सवलत लोकनेत्यांनी आणली

पाटण : ‘विधानसभेत पुत्राचा पराभव झाला म्हणून जनतेवर रुसून तोंड लपविणाऱ्या माजी मंत्र्यांनी गेली दोन वर्षे तालुक्यातील जनतेकडे पाठ फिरविली आहे. पितापुत्र लोकांची विचारपूस करायलाही वाडी-वस्तीवर गेले नाहीत. आता निवडणुका आल्या की त्यांची पावले वळू लागली असून, तालुक्यातील जनतेनेच पाटणकरांना गावच्या वेशीवरच अडवून त्यांना जाब विचारला पाहिजे,’ असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगावला. दरम्यान, ‘सध्या वाढविण्यात आलेली ईबीसी सवलत शिक्षणमंत्री असताना बाळासाहेब देसार्इंनीच आणली,’ असेही ते म्हणाले. मोरणा विभागातील गुरेघर, पाचगणी, काहीर, दिक्षी, माणगाव, मोरगिरी, गोकूळ तर्फ पाटण, बाहे येथील गावांसाठी १२ कोटींच्या रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार देसाई म्हणाले, ‘मोरणा भागातील जनता पाटणकरांना आता मते मागू देणार नाही. काही वर्षांतच पाटण तालुक्यात विणलेले रस्त्याचे जाळे व विकास जिल्ह्यातील, राज्यातील लोक बघायला येतील. तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र झटताना स्वत:चे वैयक्तिक नुकसान झाले तरी चालेल; पण लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मोकळ्या हाताने कधीही पाठविले नाही. माजी आमदार पाटणकर हे गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत विधानसभेत कधी बोलल्याचे ऐकले नाही. वाड्यात बसून कामे होणार नाहीत, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास रविराज देसाई अ‍ॅड. मिलिंद पाटील, बशिर खोंदू तसेच आटोली, पाचगणी, धावडे, कोकिसरे, पेठशिवापूर, गोकुळ तर्फ पाटण, अंबेघर तर्फ मरळी, काहीर गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नथुराम कुंभार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी) मंत्री राहिलेल्यांना फरक समजला नाही... ‘राज्याचे बांधकाममंत्री पद भोगलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांना रस्त्याचे खड्डे मुजविणे आणि संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे यातील फरक समजत नाही. त्यामुळे माझ्यावर केवळ खड्डे मुजविण्याचे काम करता म्हणून ते आरोप करत आहेत. तेव्हा पाटणकरांनी माझ्याकडून रस्त्यांच्या कामाची व त्यावर पडलेला निधी याची यादी घ्यावी आणि अभ्यास करावा,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले. नरेंद्र पाटील यांच्या बतावण्या.. ढेबेवाडी विभागात लाखोंची कामे केल्याच्या बतावण्या एक आमदार करत असून, आमदार देसाई यांनी केवळ एका टप्प्यात ८ कोटींची कामे ढेबेवाडी विभागात दिली. ती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरावे देण्याची गरजच नाही, असे उपसभापती डी. आर. पाटील यांनी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव न घेता सांगितले. दाखल्यांमुळे तरुणांना नोकऱ्या... गृहमंत्री असताना कोयनेच्या भूकंपबाधित कुटुंबासाठी भूकंप दाखला देण्याचा कायदा लोकनेत्यांनी केला. मात्र, १९९५ सालापासून दाखले देण्याचे काम बंद झाले. त्यानंतर अनेक वेळ आमदार व एकवेळा मंत्री झालेल्या पाटणकरांनी दाखले सुरू करण्यासाठी काहीच केले नाही. मी आमदार झाल्यानंतर २०१४ सालापासून दाखले पुन्हा मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुण पोलिस व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती होऊ होत आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.