शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गटासाठी होणार गर्दी; गणांसाठी शोधाशोध !

By admin | Published: October 18, 2016 12:47 AM

हिंगणगाव : फलटण तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट खुला झाला असून, गणही खुल्या वर्गातील महिलेसाठी तर सुरवडी गण ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत गटातील निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी असणार आहे तर गणांसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. हिंगणगाव गट काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीपूर्वी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातील पाण्याचे पूजन झाले आणि चित्र पालटले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सारिका अनपट यांनी काँग्रेसच्या विमलताई साळुंखे-पाटील यांचा पराभव केला. त्यानंतरच्या कालावधीत राजकीय क्षेत्रात अनेक बदल झाले. सध्या तर आरक्षणात हिंगणगाव गट खुला झाला असून, गण महिलेसाठी तर दुसरा सुरवडी गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. गतवेळी दिवंगत आमदार चिमरणराव कदम यांचे समर्थक दत्ता ऊर्फ धैर्यशील अनपट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्यासमोर उभे राहण्यास कोणी तयार नव्हते. दत्ता अनपट यांनी पत्नी सारिका यांच्यासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी पत्नी विमलताई यांच्यासाठी निवडणूक लढविली. मात्र, धोम-बलकवडीचे पाणी आणि काँग्रेसमधीलच गटबाजीमुळे साळुंखे-पाटील यांना पराभव पत्करावा लागला. असे असलेतरी सुरवडी गणातून मात्र काँग्रेसचेच धनंजय साळुंखे-पाटील हे निवडून आले. गेल्यावेळच्या निवडणुकीनंतर राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी हिंगणगाव गटावर लक्ष केंद्रित केले. अनपट यांच्या माध्यमातून गट आणि गणात विकासकामे करण्यात आली. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी गट खुला झाला आहे. हिंंगणगाव गण महिलेसाठी राखीव आहे. गणासाठी पंचायत समितीच्या सदस्या स्वाती भोईटे यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादीकडून पुन्हा होऊ शकतो. तसेच दीपाली प्रवीण भोईटे यांच्याही नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून सीमा भोईटे दावेदार आहेत. तर सुरवडी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या गणातून प्रियांका सरक, विद्या देवकर, मंजुषा भोसले यांची नावे सध्यातरी चर्चेत आहेत. हिंगणगाव गट खुला झाल्याने दत्ता अनपट, विलासराव झणझणे, म्हस्कू अनपट, शरदराव भोईटे, अनिल भोईटे, विश्वासराव निंबाळकर सुभाषराव धुमाळ, विलासराव नलवडे, शंकरराव नलवडे, नवनाथ बोबडे, चंद्रकांत बोबडे, पंकज शिंदे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत येत आहेत. काँग्रेसकडून प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, राजेंद्र काकडे, दादासाहेब नलवडे, सुरेश भोईटे यांची नावे पुढे आली आहेत. भाजपकडून विशाल झणझणे, संजय निंबाळकर, सुरेश निंबाळकर इच्छुक आहेत. शिवसेनेकडून हणमंत बासर तर रासपकडून खंडेराव सरक दावेदार समजले जातात. कदम गटाला नेतृत्व... काही दिवसांपूर्वीच दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांचा मुलगा सह्याद्री कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कदम गटाला आता नेतृत्व मिळाले आहे. परिणामी कदम गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना, भाजप, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, महाआघाडी अशी तिरंगी लढत गटात होऊ शकते.