शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

कडक उन्हामुळे सुकू लागली रोपे, ऊस पाचटीच्या आच्छादनामुळे पुन्हा झाली हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 2:06 PM

उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकून टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.

सुर्यकांत निंबाळकरआदर्की : पर्यावरणाचा ऱ्हास व कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता होती यांचा विचार करुन बिबी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा १३०० नाराळाची रोपे लावून जगवली. उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकल्याने व टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.बिबी ता. फलटण येथील तरूण व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आठ महिन्यापूर्वी बिबी फाटा ते बिबी गाव, शाळा परिसर, बाजार तळ, वाघजाईनगर, महादेव मंदिर परिसर, बिबी-कोराळे रस्ता आदी ठिकाणी खड्डे खोदुन श्रमदानात नारळाची रोपे लावली. प्रारंभी टँकरने पाणी घालुन रोपे जगवली. त्यानंतर तीन किलोमीटर ठिंबक पाईप टाकून कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्याने रोपे हिरवीगार दिसत होती.परंतू, कडक उन्हामुळे रोपे सुकू लागली होती. म्हणुन सर्व रोपांभोवती उसाच्या पाचटीचे आच्छादन घातल्याने जमिनीची होणारी धूप थांबून टँकरद्वारे घातलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबले आहे. यामुळे झाडाच्या बुध्यामध्ये ओलावा टिकणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणी दिली. पावसाळ्यात रोपे हिरवीगार दिसत  होती परंतु उन्हाळ्यामुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून पाचटीचे आच्छादन केले आहे.यावेळी संजय बोबडे, अमोल बोबडे, हृषीकेश बोबडे, प्रमोद बोबडे, मंगल बोबडे, विशाल बोबडे, रावसाहेब बोबडे उपस्थित होते.

गावातील तरुण, ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिबी-फाटा ते बिबी गाव इतर ठिकाणी नारळाची रोपे लावून त्याला ठिंबकव्दारे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी दिली आहे. पाचटीचे आच्छदन टाकल्याने ओल टिकून राहिली ने झाडे हिरवीगार दिसत आहेत.  - विशाल बोबडे, ग्रामपंचायत सदस्य बिबी ता . फलटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण