शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By दीपक शिंदे | Published: October 31, 2022 10:17 PM

Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- दीपक शिंदेसातारा - ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील काही मोठे प्रकल्प बाहेर गेले यासाठी केवळ आमचे सरकार जबाबदार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे याबाबत मी फारसे बोलणार नाही. पण, लवकरच काही प्रकल्प राज्यात येतील. याठिकाणच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, तरुणांच्या हाताला काम देणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाने सर्व टीकांना उत्तरे देऊ. त्यांनी टीका करत राहायचे आणि आम्ही काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे लोकांच्या हातात आलेले पीक वाया गेले आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही निकष बदलून भरपूर मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे. यापूर्वी कधीही एवढी मदत मिळाली नव्हती तेवढी मदत देण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम हे सरकार करत असून त्यांच्याबाबत आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या कामापासून मागे हटणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हेच लक्षात ठेवून आमचे काम सुरु आहे.

राज्यातील बळीराजा आणि जनता सुखी राहू देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तरीही या राज्यातील गोरगरीब जनता, बळीराजा सुखी राहू दे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कायम येऊ देत अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर