शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

मनोमिलनासोबत भाजपनेही

By admin | Published: November 09, 2016 1:11 AM

भाजपवरही जोरदार टीकास्त्र

सातारा : ‘मनोमिलनाच्या प्रदीर्घ काळाच्या सत्तेमुळे शहराची बकाल अवस्था होऊन बसली आहे. मागील पाच वर्षांत शहरातील मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सध्या मनोमिलनापासून फारकत घेऊन स्वतंत्र लढणाऱ्या भाजप उमेदवारांनीदेखील सत्तेत राहून खीर ओरपली. हे लोक शहरातील नागरिकांना कसा काय न्याय देतील?,’ असा प्रश्न महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. सीमा पवार यांनी मनोमिलनाच्या सत्तेसह भाजपवरही जोरदार टीकास्त्र झोडले. साताऱ्यात काँगे्रस, राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहिले नाहीत. दोन्ही पक्ष आघाड्यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजप साताऱ्यात अच्छे दिन आणण्याच्या बाता मारत आहेत. परंतु त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार याआधी मनोमिलनाच्या सत्तेतच काम करत होत्या. मग त्यांना का अच्छे दिन आणता आले नाहीत? या सर्व पक्षांनी मिळून साताऱ्याच्या विकासाचा निधी लाटला आहे. कायद्यानुसार वॉर्ड समित्या स्थापन करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. कोट्यवधींचा निधी शहराच्या विकासासाठी वापरल्याचे सांगितले जात असले तरी हा निधी कुठे मुरला? याचा हिशोब शहरवासीयांना द्यावा, मगच निवडणूक लढण्यासाठी पुढे यावे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. प्रचारानिमित्त प्रभागात फिरताना आलेले अनुभव सांगताना सीमा पवार म्हणाल्या, ‘प्रस्थापितांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोकांना बदल हवा आहे. पाणी मुबलक असून, त्याचे व्यवस्थापन नाही. गरिबांच्या कस्तुरबा रुग्णालयाला अद्याप टाळे लागलेले आहे. शहरातील पाणी गळती काढली जात नाही. रेल्वे स्टेशनवरून साताऱ्यात यायला अथवा जायलाही सिटी बसची सुविधा नाही. मंडईत पाय ठेवायलाही जागा नसताना कोंडमारा सहन करत लोकांना भाजी खरेदी करावी लागत आहे. पालिकेत गेलो तर अडचणींची नोंद तर होतच नाही, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. अस्वच्छतेमुळे लोक आजारी पडण्याची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून केली गेली आहे.’ शहरातील विकासकामांच्याही बोऱ्या उडाल्याचे सांगताना सीमा पवार यांनी ‘पालिका शाळांमध्ये बेंचेसची व्यवस्था नाही. मुलांना पोषक आहार दिला जात नाही. भाजप पॅक्ड फूड पुरविण्याची भाषा वापरून मल्टिनॅशनल कंपन्यांचे हित जोपासत आहे. शहरात असणारा दूध संघ बंद आहे. कस्तुरबा रुग्णालय बंद आहे. शहर सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही याबाबत अनेकदा आंदोलन केली. परंतु दबंगशाहीमुळे कार्यवाही होताना दिसत नाही.’ ‘आम्ही सातारकर पुण्या-मुंबईला रोजगार सप्लाय करणारे आहोत काय? साताऱ्यातील प्रस्थापितांच्या चुकीच्या कारभारामुळे रोजगारासाठी मुले साताऱ्याबाहेर जाऊन स्थायिक होत असून, त्यांचे आई-बाप तेवढे जुन्या घरात राहतात, मुलांशी त्यांचा इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क होतो, त्यामुळे प्रस्थापितांनी साताऱ्यातील अशी अनेक घरे उद्ध्वस्त केली आहे. (लोकमत टीम)२