शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

माढा अन् सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव, अभयसिंह जगताप यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:51 IST

जयकुमार गोरे यांनी गैरव्यवहारातून १४ गाड्या घेतल्याचा आरोप

दहीवडी : आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आलिशान १४ चारचाकी गाड्या ह्या ठेका आणि इतर कामांच्या कमिशनमधून व मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कमावलेल्या करोड रुपयांच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. माढा आणि सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव झाला आहे,’ असा आरोप अभयसिंह जगताप यांनी केला आहे.दहीवडी येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभयसिंह जगताप म्हणाले, ‘आमदार गोरे सांगतात की, माझ्याकडे १४ चारचाकी गाडी आहेत. त्या गाड्या त्यांच्या नावावर आहेत का? त्या गाड्या मेलेल्या माणसाच्या नावांवर पैसे काढून, कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन घेऊन, इतर अन्य अवैध कामाच्या भ्रष्टाचारातून घेतलेल्या आहेत हे माण खटावच्या संपूर्ण जनतेला माहीत आहे. मी घेतलेली गाडी ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाच्याही पापाचा एक रुपया नाही. मी सरकारला कायदेशीररीत्या इन्कमटॅक्स भरतो. मी इच्छापूर्ती म्हणून गाडी घेतलेली नाही. गेल्या महिन्यामध्ये माझ्या गाडीचा लोणंद फलटण महामार्गावर अपघात झाला होता. त्यामध्ये माझा जीव वाचला व माझ्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते म्हणून मी दुसरी गाडी स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली, याचे आमदार गोरे यांना वाईट वाटले की, त्यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगण्याची वेळ आली. जयकुमार गोरे यांनी २०१९ च्या निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्र जमा केले. त्यानुसार २०१५ चे उत्पन्न २२ लाख दाखविले. २०१७ ला ३३ लाख ९६ हजार, २०१८ चा ३९ लाख ९१ हजार रुपये दाखविले आहे. एवढ्या साऱ्या उत्पन्नाची बेरीज केली तरी एक आलिशान गाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आमदार गोरे यांनी घेतल्यात १४ गाड्या ह्या गैरव्यवहाराच्या पैशाच्याच आहेत.मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सेंटर उभा करून शेकडो मृत व्यक्तींना जिवंत दाखवून मागासवर्गीय मृत व्यक्तीची जमीन नावावर करून घेऊन करोडो रुपये कमावले. त्यातून आलिशान गाड्या घेऊन तुम्ही फिरता. आम्ही वरकुटे मलवडी येथे स्वखर्चातून कोरोना सेंटर उभा करून विनामूल्य सेवा करून अनेकांना जीवनदान दिले. आम्ही पुण्य कमावले आहे तुम्ही पापाचे घडे भरलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यांत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे वक्तव्यदेखील अभयसिंह जगताप यांनी केले.

तर ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाहीतमाढा लोकसभेला माण-खटावमधून २३ हजारांचे मताधिक्य कोट्यवधी रुपये वाटून मिळाले आहे. आमदार गोरे यांनी पैसे नाही वाटले तर ग्रामपंचायत ही जिंकता येणार नाही पण राष्ट्रवादीला मिळालेले मतदान हे कोणालाही पैसे न वाटता प्रेमाने मिळालेले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmadha-acमाढाSolapurसोलापूरJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपा