शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सातारा : भाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:51 IST

काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्देभाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे : प्रकाश जावडेकर बँकांची कर्जे बुडविणाऱ्यांच्या विदेशातील मालमत्ता जप्त करत असल्याचे स्पष्टीकरण

सातारा : काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.मंत्री जावडेकर म्हणाले, राज्यातील २७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये २०० ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे लाट केवळ २०१४ ची नव्हती, तर गेल्या चारही वर्षात सर्व निवडणुकांत भाजपची वाढ झाली आहे.सर्वसामान्य जनतेला सुशासन हवे आहे. जातीपातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत. तसेच खोटेनाटे प्रचार करून लोक मते देत नाहीत, हे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची लोकांच्यातील मान्यता संपुष्टात येत आहे.भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी मिळत नसल्याने नसलेले मुद्दे चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्याने लोक आमच्यासोबतआहेत. राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील लोकच आता आम्ही मोदींच्या बरोबर असल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.दरम्यान, बँकांची कर्जे बुडविणाऱ्या कर्जदारांच्या विदेशातील मिळकतीही ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. बुडित खात्यातील कर्जे सरकारने माफ केलेली नाहीत. केवळ बँकांचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कर्जे थकीत कर्जदारांकडून कुठल्याही परिस्थितीत वसूल केली जातील, असेही मंत्री जावडेकर यांनी सांगीतले.साताऱ्यात भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी असल्याचा दावासातारा जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकांत भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, असा दावा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. लोक सुशासनाला मते देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीministerमंत्री