शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सातारा: आंधळी धरण भरले! सिंचनाचा प्रश्न मिटणार, माणगंगा नदी आता जोमाने वाहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 4:30 PM

या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

नवनाथ जगदाळेदहिवडी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले माणगंगा नदीवरील आंधळी धरण गुरुवारी सकाळी ६ वाजता भरले. सांडव्यातून पाणी पडल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे.माण तालुक्यातील ढाकणी, राणंद, गंगोती, लोधवडे हे तलाव भरले असून गुरुवारी आंधळी धरण भरले आहे, तर ब्रिटिशकालीन पिंगळी तलावामध्येही पाण्याची मोठी आवक चालू आहे. याशिवाय झाशी तलावही भरण्याच्या मार्गावर असून महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी आणि जांभूळणी तलाव भरण्याचे अद्याप बाकी आहे.माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस कमी होता. मात्र, परतीच्या पावसाने विशेषत: ऑक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. आंधळी पाणलोटामध्येही गेले आठ दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे माणगंगा नदीवर असलेल्या आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. त्यानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.

या धरणाचा पाणीसाठा ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा असल्याने या धरणावर बिदाल, आंधळी, टाकेवाडी, पांगरी, बोडके, दहिवडी गोंदवले या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अवलंबून असल्याने तो प्रश्न आता सुटला आहे. माणगंगा नदीवर असणारे ३० ते ४० बंधारे भरले असल्याने आता माणगंगा पूर्णपणे वाहती झाली आहे.

चौदा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीआंधळी धरणामध्ये ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा पाणीसाठा होत असतो. या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

आंधळी आतापर्यंत दहा वेळा भरलेया आंधळी धरणाचे काम २००० साली पूर्ण झाले. त्यानंतर आज हे धरण दहाव्यांदा भरले. याअगोदर भरलेल्या तारखा पुढीलप्रमाणे - ८ ऑक्टोबर २००१, १ सप्टेंबर २००५, १० ऑगस्ट २००६, १० जुलै २००७, ९ सप्टेंबर २००९, ११ ऑगस्ट २०१०, २६ सप्टेंबर २०१३, २३ ऑक्टोबर २०१९, १९ सप्टेंबर २०२०, २० ऑक्टोबर २०२२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरण