शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

कळंभे-महिगाव रस्त्यावरील पूल ढासळला- पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 8:52 PM

कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण

ठळक मुद्देधोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवरील पूल

पाचवड : कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण निर्मितीवेळी बांधण्यात आलेला हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचा होता. पाटबंधारे खात्याने वेळोवेळी डागडुजी न केल्यामुळे तसेच यावरून रहदारी वाढल्यामुळे पूल अत्यंत जीर्ण झालेला होता.

गणपती माळावर असलेल्या या पुलावरून कळंभे गावाबरोबरच खर्शी, महिगाव व कुडाळ गावांमधील शेतकऱ्यांची शेतमालाची वाहतूक चालते. जीर्ण पुलाचे नव्याने काम करण्यासाठी कळंभे ग्रामस्थांनी अनेकदा धोम पाटबंधारे विभागाच्या आनेवाडी व वाई कार्यालयाला निवेदने दिली होती. मात्र या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करीत कळंभे ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यानेच आज हा पूल ढासळला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पुलावरून शेतकऱ्यांच्या ऊस पिकाबरोबरच इतर मालाची ने-आण करावी लागत असल्याने या पुलाचे नव्याने बांधकाम होत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर नवीन पुलाची उभारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश बाबर, बंडा शिवथरे, आदिनाथ गायकवाड, दिनकर शिवथरे, बळवंत गायकवाड, संग्राम शिंगटे, लक्ष्मण जाधव, महेंद्र मोहिते, नितीन शिवथरे, संतोष गायकवाड, बापू वाघ व कळंभे ग्रामस्थांनी दिला आहे.सध्या धोम उजवा कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे. पुलाचा ढासळलेला भाग कालव्यामध्ये कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले गेले आहे. पाटबंधारे विभागाकडून यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास येथील कॅनॉलला मोठे भगदाड पडून आसपासची शेतजमीन पाण्याखाली येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा