शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी!

By नितीन काळेल | Published: June 28, 2024 8:02 PM

जिल्हा उपनिबंधकांची सूचना : जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी फतवा 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यातील शेतकरी आले खरेदीच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून सातारा बाजार समितीतही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे आले सरसकट खरेदीचा ठराव झाला होता. यानंतर आता याची जिल्हा उपनिबंधकांनी दखल घेतली असून याबाबत सर्व बाजार समित्यांना सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात नवीन आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेऊन सातारा बाजार समितीने मागील रविवारी व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या.

व्यापाऱ्यांकडून नवीन आणि जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत होते. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरेपर्यंत वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. तर व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर यावेळी शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावे. सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास संबंधिताचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले होते. या ठरावाची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल उपनिबंधक मनोहर माळी यांनी घेतली आहे. तसेच बाजार समितींना सूचना केली आहे.

व्यापाऱ्यांनी आल्याची नवे आणि जुने अशी प्रतवारी केल्याने किमतीत फरक फडतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर`थिक नुकसान होते हे निवेदनाद्वारे कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच सातारा बाजार समितीनेही आल्याची प्रतवारी करु नये असा ठराव केला असून तो कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आले प्रतवारीने शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यातील संघर्ष यातून बाजार समितीचे कामकाज, शेतमालाचा लिलाव यावर विपरित परिणाम होऊ नये. यासाठी आवश्यक त्या उपायोजना कराव्यात, अशी सूचना उपनिबंधकांनी केली आहे. त्यामुळे आता प्रतवारी न करता आले विक्रीचा सरसकट निर्णय झाल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेत सर्व बाजार समित्यांना सरसकट आले खरेदीची सूचना केली आहे. आता सूचनांची अंमलबजावणी होण्यासाठी बाजार समित्यांनी दक्ष राहण्याची गरजेचे आहे. केवळ शासकीय कागद नाचविल्यास आणि सरसकट आले खरेदी न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती