शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

युक्रेनमधील विद्यार्थ्यांबाबत केंद्र असंवेदनशील; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 5:49 AM

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती आता पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड (जि. सातारा) : युक्रेनमध्ये अडकलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणे व उद्घाटने करत फिरत आहेत. ते युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत फार गंभीर आहेत, असे वाटत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.  कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती आता पाहायला मिळत आहे.विधिमंडळ अधिवेशनावेळी राष्ट्रगीत सुरू असताना राज्यपाल तेथून निघून गेले. इतिहासात यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. राज्यपालांनी असे वागून राष्ट्रगीताचा, घटनेचा तसेच राज्यातील तमाम जनतेचा अपमान केला असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

मुंबई-बंगळुरू कॉरिडॉर महत्त्वाचा... nकऱ्हाडच्या विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. nबांधकाम परवान्यांबाबतची अनिश्चितता संपली असून, कऱ्हाड व परिसरात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. nत्यासाठी कऱ्हाड-चिपळूण रेल्वे व रस्ते वाहतूक व्हावी तसेच मुंबई ते बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर मंजूर व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण म्हणाले.