शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान

By admin | Published: February 21, 2017 11:36 PM

पाणीसाठे संपण्याच्या मार्गावर : आंधळी, पिंगळीत मृतसाठा; मासाळवाडी तलाव पूर्ण कोरडा, अखेरच्या टप्प्यात पावसाची हुलकावणी

दहिवडी : माण तालुक्यातील बहुतांशी पाणीसाठे आटण्याच्या मार्गावर आहेत. आंधळी धरण, पिंगळी, महाबळेश्वरवाडी, जाशी तलावात सध्या वापरण्यालायक नसलेला मृतसाठा शिल्लक आहे. मासाळवाडी तलाव पूर्ण कोरडा पडला आहे तर ब्रिटिशकालीन राणंद, लोधवडे, गंगोती तलावात वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. परिणामी तालुक्यातील पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरले गेले नाहीत. माणगंगा नदीवर आंधळी धरण असून, या धरणातही वापरण्यायोग्य नसलेला पाणीसाठा आहे. या धरणावर दहिवडी, गोंदवलेसह ११ गावांची जीवन प्राधिकरणची पाणी योजना आहे. येथील पाणीसाठा संपुष्टात आल्यास या पाणी योजनेला मोठा फटका बसणार आहे. तसा सध्या धरणात मृत पाणी साठाच शिल्लक आहे. पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्यामुळे लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणीटंचाई जाणवू नये तसेच माणगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता प्रशासनाने पुढाकार घेऊन उरमोडीचे पाणी माणगंगा नदीत सोडावे, अशी मागणी होत आहे. उरमोडीचे पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने लक्ष घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो. उरमोडीचे पाणी सोडल्यास माणगंगा नदीवरील सिमेंट साखळी बंधारे व जुने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरल्यास माण तालुक्याच्या पूर्व भागाला टंचाई जाणवणार नाही. उरमोडीचे पाणी सोडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पिंगळी तलावाचे काम ब्रिटीश कालखंडात झाले आहे. या तलावाला पाणलोट क्षेत्र अतिशय कमी आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला तरी हा तलाव नैसर्गिकरीत्या पूर्ण क्षमतेने भरत नाही. यासाठी माणगंगा नदीतील पाण्याने हा तलाव भरला जातो. ही संकल्पना ब्रिटिशांची होती. बिदाल येथील तटवस्ती नजीक माणगंगा नदीवर तट टाकून पाणी अडवले जाते. हे पाणी अडवून कालव्याद्वारे सायफन व प्रवाही पद्धतीने दहिवडीमार्गे सोडून तलाव भरून घेतला जातो. मात्र, यावर्षी आंधळी धरण भरले नाही अन् नदीला पाणी वाहिले नसल्याने पाणी सोडले नाही. (प्रतिनिधी)