शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

स्वच्छ-सुंदर सातारा निव्वळ घंटागाडीच्या गाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:24 AM

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. ...

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर सातारा हे निव्वळ घंटागाडीवर गाणं वाजविण्यापुरतंच राहिल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

भल्या सकाळी शहरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचा दिवस अगदी सकाळी ६ पासून सुरू होतो. गेल्या काही दिवसांपासून घंटागाडीवर कोविडचे प्रबोधनगीत वाजवले जाते. या गीताचे बोल कानी पडले की सातारकर घरातील कचरा घंटागाडीत टाकायला म्हणून बाहेर पडतात. काही महिन्यांपूर्वी शहरात शाहूनगरचा समावेश करण्यात आला. त्रिशंकू असलेल्या शाहूनगर परिसरात पूर्वी कॉलनीतील रहिवाशांनी स्वखर्चाने कचरा गोळा करण्यासाठी गाडी लावली होती. प्रत्येक घरातून महिन्याला तीस ते पन्नास रुपये देऊन हा कचरा गोळा केला जात होता. पालिका हद्दीत आल्यानंतर मात्र खाजगी घंटागाड्या बंद करण्यात आल्या. संपूर्ण शाहूगनरमध्ये एकच गाडी असल्याने ही घंटागाडी निव्वळ मुख्य रस्त्यावरच उभं राहून स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे गाणं ऐकवते. त्यामुळे अंतर्गत सोसायटीतील नागरिक मुख्य रस्त्यावर येऊन कचरा टाकेपर्यंत गाडी निघून जात असल्याचे सत्र सुरू झाले आहे. परिणामी नागरिकांच्या घरातच कचरा साठू लागला आहे.

शाहूनगर येथून सातारा शहरात येण्यासाठी अनेकजण चार भिंतीच्या रस्त्याने ये-जा करतात. उच्चविद्याविभूषित आणि महागड्या गाड्यांतून येणारे अनेक जण चार भिंतीसमोरच कचरागाडीतून फेकत असल्याने तिथेही घाणीचे साम्राज्य साठले आहे. घरात कचरा साठवून ठेवून त्यावर बसणाऱ्या चिलटांचा त्रास नको म्हणून हा मार्ग निवडला जात असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र यामुळे स्वच्छ साताराची घोषणा प्रत्यक्षात उतरत नाही. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट :

पूर्वी ७० आता २०० ची मागणी !

नगरपालिका हद्दीत शाहूनगर परिसर नसल्याने पूर्वी येथे सोसायट्यांनी एकत्र येऊन घंटागाडी सुरू केली होती. प्रत्येक सदस्याकडून ७० रूपये पूर्वी घेतले जायचे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर ही गाडी थांबायची. पालिका हद्दीत शाहूनगर समाविष्ट झाल्यानंतर मात्र या घंटागाडीचाही दर वाढला. आता एका कुटुंबाकडून महिन्याला निव्वळ कचरा उचलून नेण्यासाठी दोनशे रुपये मागितले जात आहेत.

कोट :

दिवसभर कामाच्या निमित्ताने आम्ही घराबाहेर असतो. त्यामुळे सकाळी घंटागाडी आली नाही तर कचरा तसाच घरात साठून राहतो. चार-पाच दिवस कचरा घरात राहिला की त्यात आळ्या होतायत. या आळ्या स्वयंपाकघरातही येऊ लागल्यात. त्यामुळे घंटागाडीची वेळ आणि शुल्क यावर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे.

- अ‍ॅड. चैत्रा व्ही. एस. शाहूनगर

...............