शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता ‘उमेद’ने करुन दाखवले, साताऱ्यातील ९ लाख नागरिकांशी साधला संवाद 

By नितीन काळेल | Updated: May 8, 2024 18:47 IST

पथकांनी घराबाहेर पडून केले प्रोत्साहित 

सातारा : रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत पथकांनी घराबाहेर पडून लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. ९ लाख नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीस हातभार लागला. यामुळे ‘उमेद’ टीमचे काैतुक होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. यासाठी उपक्रम राबवून मतदारांत जनजागृती करण्यात आली. याचा फायदा या निवडणुकीत दिसून आला. तसेच या मतदानवाढीसाठी ‘उमेद’मधील महिलांनीही मोठी कामगिरी बजावलीय. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उमेद अंतर्गत कार्यरत टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण ‘उमेद’मध्ये कार्यरत प्रेरिकांनी गृहभेटी, प्रत्यक्ष पात्र मतदारांची भेट घेऊन मतदान करण्यास प्रोत्साहित केले. यामुळेच गतवर्षीपेक्षा उन्हाची तीव्रता अधिक असतानाही मतदानाचा टक्का वाढविण्यास हातभार लागला. मागील निवडणुकीत ६० टक्क्यांहून अधिक मतदान सातारा लोकसभेसाठी झाले होते. यंदा हेच मतदान ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामध्ये अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा आता मतदान अधिक झाल्याचेच स्पष्ट झाले आहे. यासाठी स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांचे प्रयत्नही कारणीभूत ठरले आहेत.

१० हजार महिलांशी संवाद..मतदान टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. यामध्ये दुचाकी रॅली, चित्र प्रदर्शन, गृह भेटीद्वारे पत्रक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी समाजमाध्यमाद्वारे ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत सुमारे १० हजार महिलांशी संवाद साधत मतदान वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सुमारे १५ हजार १८७ बचत समूह, ९६७ ग्रामसंघ आणि ५१ प्रभागसंघाच्या बैठका घेऊन सुमारे १७ हजार समुदाय संस्थांचे सदस्य आणि पदाधिकारी कंबर कसून मतदार जनजागृतीसाठी मैदानात उतरले होते.

मतदान राहिले त्यांना नेले केंद्रावर..‘उमेद’ टीमने रखरखत्या उन्हाची कसलीही पर्वा न करता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन सुमारे ९ लाख नागरिकांचे मतदानाविषयी समुपदेशन केले. याशिवाय मतदानादिवशीही आपली जबाबदारी १०० टक्के बजावताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक व्यक्ती केंद्रापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान कसे करेल यासाठी नियोजन केले. कोणाचे मतदान झाले, कोणाचे बाकी आहे याची माहिती घेतली. त्यानंतर मतदान राहिले आहे त्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान