शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

रोजगार हमीची कामे पूर्ण करा

By admin | Published: December 18, 2014 9:38 PM

माणिकराव सोनवलकर : खंडाळा पंचायत समितीत आढावा बैठक

खंडाळा : ‘अधिकारी व पदाधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास गावोगावी शासकीय योजना प्रभावीपणे राबू शकतात. खंडाळा तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी जिल्हा परिषदेच्या मार्फत सोडविल्या जातील,’ असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिले.खंडाळा पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात स्वच्छ भारत अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, शिक्षण सभापती अमित कदम, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, स्वाती बरदाडे, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती रमेश धायगुडे, सदस्य नितीन भरगुडे-पाटील, दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, अनिता शेळके, अजय धायगुडे, मनोज पवार, गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते.सोनवलकर म्हणाले ‘स्वच्छ भारत अभियानात’ प्रत्येक गावी एक कुटुंब, एक शौचालय योजना प्रभावीपणे राबवा, निर्मलग्रामसाठी तालुक्याने चांगले काम केले होते. त्याप्रमाणे हे अभियान यशस्वी करावे. ‘मनरेगा’ची कामे करताना सरपंचांना विश्वासात घेऊन करण्यात यावीत. ग्रामसेवकांनी याबाबत काळजी घ्यावी. शासकीय योजनांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे.मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियानात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम करावे. कामात चुकारपणा केला तर संबंधितावर कारवाई केली जाईल. लोकांच्या भल्यासाठी शासनाने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे हे आपले काम आहे. योजना राबविताना प्रत्येकाने मानसिकता बदलून विधायक दृष्टीने विचार करावा.’रवी साळुंखे, नितीन भरगुडे-पाटील, स्वाती बरदाडे यांनी मार्गदर्शन केले. विलास साबळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)अडचणी मांडल्या...तालुक्यात मनरेगाची कामे करताना येणाऱ्या अडचणी सरपंचांनी मांडल्या, गतवर्षी केलेल्या कामांचे पैसे अद्याप दिले नसल्याचे मनोज पवार यांनी सांगितले. ग्रामसेवक अशोक पवार व सारिका हाके यांचा चांगल्या कामाबाबत सत्कार करण्यात आला.