शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Lok Sabha Election 2019 काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ५० वर्षे पाण्याचेच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:37 IST

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण ...

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण नको तर विकास हवा आहे. त्यामुळे आता जनता पाठीशी असल्याने महायुती माढा, बारामती काय सातारासुद्धा जिंकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान, साताऱ्याची लढाई ही राजा विरुद्ध प्रजा असून, राजांबद्दल मी बोलणार नाही, सगळ्यांना सगळे माहीत आहे, असा चिमटाही काढत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट टीका करणे टाळले.कोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश शिंदे, मनोज घोरपडे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहुल बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘आजच पंतप्रधानांची अकलूज येथे माढा मतदार संघाची सभा झाली. पश्चिम महाराष्टÑातून मोठा जनसागर लोटला होता. शरद पवार यांना हवेचा अंदाज येतो, असे म्हणतात, ते खरे आहे, म्हणून त्यांनी अपघात टाळण्यासाठी यू टर्न घेतला. अगोदर स्वत: फलंदाजी करणार म्हणून गवगवा केला आणि सातव्याच दिवशी राखीव खेळाडू म्हणून राहणे पसंत केले. एकूणच महायुतीला सर्वत्र चांगले वातावरण असून, माढाच काय, बारामती आणि सातारा देखील आम्हीच जिंकणार आहोत.’काँग्रेस-राष्टÑवादीने ५० वर्षे पाण्याचेच राजकारण केले. सातारा जिल्हा पाणीदार असताना, त्याच्या हक्काचे पाणी इतरत्र पळविण्याचे पाप केले. या जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावला. या उलट भाजप सरकारने सातारा जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली. आजच गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा अंतिम स्लॅब देखील पडला असून, उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत. या योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्याबरोबर चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यव्यापी दौरा केला, त्यांचा काटा कोणी काढला, हे जनतेला माहीत आहे. त्यासाठी जावळीचा गडी आणला, त्यांनी माथाडी कामगार बरोबरआणले. त्यांनी दहा वर्षांत काही केले नाही, स्थानिक स्वराज्य संस्था बंद पाडण्याचे काम केले. तालुक्याचा दुष्काळ ते साधा हटवू शकलेनाहीत. त्यांना जनता काय करूशकते, हे दाखवून देणार असून, कोरेगावातच मुक्काम ठोकणार आहे, असा इशारा देत नरेंद्र पाटील यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखाना स्वस्त:त लाटणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनीचौकशी करावी आणि कारखान्याच्या शेतकरी-सभासदांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.पश्चिम महाराष्टÑावर अन्याय नाही...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असून, ते पश्चिम महाराष्टÑावर अन्याय करतील, अशी टीका काँग्रेस-राष्टÑवादीने केली होती. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी आम्हाला वाटत होते, त्यांनी पश्चिम महाराष्टÑाचे भले केले आहे; मात्र प्रत्यक्षात कसलेही काम झाले नव्हते. मी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विदर्भच काय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाला न्याय देण्याचे काम केले. सातारा जिल्ह्यात राष्टÑीय महामार्गासाठी चार हजार कोटी तर पाणी योजनांसाठी चार हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.कॉलर आणि मिशा !नरेंद्र पाटील आणि महेश शिंदे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलरच्या स्टाईलवर बोलले. ‘कॉलर दिवसभर वर राहत नाही, तर मिशा दिवसभर राहतात,’ असे नरेंद्र पाटील म्हणाले. महेश शिंदे म्हणाले, ‘मिशीने सातारा जिल्हा हालून गेला असून, कॉलर उडायच्या आतच फाटून गेली आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक