शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

कॉर्नर कॉर्नर पे लिखा है रिक्षा का नाम!

By admin | Published: July 10, 2015 10:20 PM

वाहतुक व्यवस्था कोलमडली : राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे

प्रगती जाधव-पाटील- सातारा -शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असणाऱ्या राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. वास्तविक यातील दोन रिक्षा थांबे अधिकृत तर बाकीचे तीन अनधिकृत आहेत. या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतुक कोलमडली आहे. राजवाडा परिसरात तब्बल सहा रस्ते आहेत. यातील प्रत्येक रस्ता शहराच्या विविध टोकांकडे जाणारा आहे. याच परिसरात बसस्थानक असल्यामुळे शहर वाहतुकीच्या बसेस आणि बोगद्या बाहेर राहणाऱ्यांसाठीच्या एसटीची वर्दळ याच भागात अधिक असते. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास हा रस्ता वाहन आणि माणसाने भरलेला असतो.काही महिन्यांपासून तीन रिक्षा थांबे सुरू झाले आहेत. राजवाडा चौपाटीशेजारी सुरू असलेला थांबा तर पार्किंगच्या बाहेर असतो. त्यामुळे तिथे संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते. याच रस्त्यावर अग्निशामनचे बंबही आहेत. शहरात कुठेही काही वाईट घटना घडली तर या बंबांना जुनी नगर पालिका ते मोती चौक हे अंतर पूर्ण करायलाच दहा मिनिटे लागतील अशी परिस्थिती आहे. राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावर दुकानांची मांडणी, परळी भागात वडाप वाहतुक करणारी वाहने आणि मंडई असे सगळेच एकत्र आहे. याच भागात एक नगर पालिकेची आणि अन्य काही शाळाही आहेत. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ आणि वाहतुकीची वर्दळ एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनाही जिव मुठीत घेवून चालावे लागते. मुख्या चौकात पाचशे फुटांच्या परिसरातच सुमारे पाच रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीबरोबरच वर्दळीलाही मर्यादा येत आहेत. संबंधित विभागाने तातडीने याविषयी खबरदारीची पाऊले उचलून या अनधिकृत रिक्षा थांब्याच्या बंदोबस्ताची गरज आहे. अन्यथा भविष्यात त्यांची संख्या वाढणार आहे. केवळ दोन थांबेच अधिकृत सातारा शहराची वाढ लक्षात घेता पूर्वी एकच थांबा येथे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे राजवाडा परिसरात अजून एक थांबा मंजूर करण्यात आला आहे. राजवाडा परिसरात केवळ दोन रिक्षा थांबेच अधिकृत आहेत. यातील एक थांबा राजवाडा बस थांब्याच्या समोर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोवईनाका, शाहूपुरी आणि मुख्य बसस्थानक परिसरात शेअर रिक्षा सुरू असतात. तर दुसरा थांबा राजवाडा समर्थ मंदिर रस्त्यावर आहे. या थांब्यावरून समर्थ मंदिर, बोगदा आणि परळी खोऱ्यात जाण्यासाठी लोक जमा होतात. येथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी लोकांचा राबता सकाळपासूनच राहतो.