शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
4
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
5
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
6
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
7
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
9
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
10
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
11
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
12
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
13
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
14
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
15
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
16
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
17
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
18
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
19
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
20
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले

कोरोना लागला वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:41 AM

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ...

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतातर कोरोनाचा कहर सुरू आहे.

0000000\

वीज सतत खंडित

सातारा : सातारा शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागातील वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास दोन ते तीनवेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला असून, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.

000

सवयभानचा विसर

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करुन दिली जात होती. पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.

0000

रस्त्यावर वाहनतळ

सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.

000000

चौकात शतपावली

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिला जात आहे. पण त्याचवेळी दररोज रात्री अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये शतपावली करण्यासाठी जमत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

00000

जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली

सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळात कोणीही शासकीय कार्यालयात येऊ नये, असे अपेक्षित आहे. तरीही विविध कामांच्या निमित्ताने लोक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये येत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कर्मचारी त्यांना नंतर येण्यास सांगतात.

000000

सोसायट्यांमध्ये वावर

सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तरी विचारणा होत नाही. पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

000000

वीजबिलाची चिंता

सातारा : ग्रामीण भागात वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आता पुन्हा लॉकडाऊन केले असल्याने नागरिक वीजबिल माफ होण्याची वाट पाहत आहेत.