शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

कोरोनाने हिरावले १३ मुलांचे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या विषाणूंनी सातारा जिल्ह्यातील १३ हून अधिक बालकांचे बाबा हिरावले आहेत. जिल्ह्यात अंगणवाडीसेविकांमार्फत याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या विषाणूंनी सातारा जिल्ह्यातील १३ हून अधिक बालकांचे बाबा हिरावले आहेत. जिल्ह्यात अंगणवाडीसेविकांमार्फत याचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे अद्यापही दोन्ही पालक गेलेल्या मुलांची नोंद नाही.

कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांचा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या बालकांना न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. कृती दलाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे असून, सदस्य म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल मुलांना आवश्यक ती मदत देण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

साताऱ्यात कोरोनाचा विळखा चांगलाच घट्ट बसू लागला आहे. काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या पालकांना त्यातही विशेषत: पुरुषांना कोविडची लागण अधिक झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून अशा मुलांची माहिती संकलित केली जात आहे. साताऱ्यात १३ मुलांनी त्यांचे वडील गमावले आहेत. सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने आकडे वाढण्याची शक्यता आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनेकदा मालमत्तेविषयी वाद निर्माण होतात. याचे निराकरण करण्याचे कामही विभाग करणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन याबाबात कामाचा अहवाल सादर करणार आहे. कृती दलाने मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढे या बालकांना न्याय्य हक्क देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांवर याची सर्वांत मोठी जबाबदारी असणार आहे.

कोट :

साताऱ्यात अद्यापही सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत हेल्पलाइनद्वारे १३ बालकांनी वडील गमावल्याची माहिती पुढे आली आहे. या मुलांना त्यांच्या कोणत्याही हक्कापासून वंचित न ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांविषयी लोकांनी माहिती द्यायला पुढे यावे.

-रोहिणी ढवळे, महिला व बालकल्याण अधिकारी

चौकट :

‘सवयभान’चा मदतीचा हात

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गतवर्षापासून सामान्य सातारकरांपर्यंत पोहोचून त्यांना जागरूक करणाऱ्या सवयभान ग्रुपने अशा बालकांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. कोविड महामारीत पालक गमावलेल्या बालकांसाठी ते निश्चित रक्कम फिक्समध्ये टाकणार आहेत. यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून मुलांचे संगोपन करण्याचं नियोजन आहे. याबरोबरच साताऱ्यातील काही दानशूर व्यक्तींनी प्रशासनाकडे या मुलांसाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रशासन काय करणार

कोविडकाळात बाबा गमावलेल्या जिल्ह्यातील १३ मुलांशी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा संवाद साधणार आहे. काका, मावशी, आत्या, मामा हे पालक खरोखरच या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यात येईल. ते सक्षम नसतील, तर ६ वर्षांवरील मुलांना बालगृहांमध्ये पाठविले जाईल. त्यापेक्षा लहान मुलांना शिशुगृहात ठेवले जाईल, असे चाइल्डलाइनचे रमेश मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

(चौकट)

सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरूच

कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्याकडून ही माहिती महिला व बालविकास अधिकाऱ्यांतर्फे अंगणवाडीसेविकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. गावपातळीवरील ही माहिती संकलित करण्याचे काम अंगणवाडीसेविकांकडे देण्यात आले आहे. त्यांची पाहणी झाल्यानंतर मग प्रत्यक्षातील आकडा समोर येणार आहे.