शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या एक्झिटने खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी मृत्यूुपत्र तयार केले आहे. जगलो तर सोबत ठेवू आणि गेलोच तर कुटुंबाला दिशा देऊन जाऊ, हा त्यामागचा उद्देश!

सातारा जिल्ह्यात कोरोना संकटाने भयावह रूप धारण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोविड मृत्यूचा दर अधिक असल्याने अनेकांना आयुष्याविषयी प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हिंदू कायद्यानुसार भारतीयांना त्यांच्या मृत्यूपूर्वी मृत्युपत्र किंवा वारसदार ठरविण्याचे तसेच संपत्ती वाटपाचे अधिकार आहेत. आपल्या पश्चात संपत्तीवरून कुटुंबात कटुता येऊ नये, या उद्देशाने पूर्वी सेवानिवृत्तीनंतर किंवा ६० वर्षांनंतर मृत्युपत्र करण्यात येत होती. कोरोनामुळे सर्वांनाच अकाली मृत्यूची भीती वाटत आहे. त्यामुळे श्रीमंतांसह मध्यमवर्गीयही मृत्युपत्र तयार करून ठेवत आहेत.

कोरोनामुळे अशाश्वत जगणं आणि अकाली मृत्यूची भीती अनेकांच्या मनात वाढली आहे. त्यामुळे सुशिक्षित व समजूतदार नागरिक त्यांच्या संपत्तीची विभागणी करून हयातीतच याबाबत स्पष्टता ठेवत आहेत. विशेष म्हणजे मृत्युपत्र तयार केल्यानंतर त्याची माहिती कुटुंबीयांनाही देण्यात येते.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) तीन बॉक्स

१ आपण कष्टाने कमावलेली इस्टेट आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. ती भलत्याच व्यक्तीने गिळंकृत करू नये, या हेतूने मृत्युपत्र केले आहे.

२ कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. माणसाच्या जिवाची खात्री राहिलेली नाही. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाने गिळंकृत केली. आपलादेखील काही भरोसा नाही, हे लक्षात आल्याने पत्नीच्या नावावर मृत्युपत्र केले.

३ माझ्या पुण्यातील एका मित्राचं संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं. तो स्वतः, त्याची पत्नी आणि मोठा मुलगा मृत्युमुखी पडले. आता त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे, अजूनही सज्ञान नाही. तो सज्ञान होईपर्यंत आम्हालाच त्याच्या इस्टेटीबाबत काळजी लागून राहिली आहे.

२) दोन वकिलांचे कोट्‌स

कोट.

कोरोनामुळे जीवनामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. बहुतांश लोक आरोग्य आणि आर्थिक चिंतेने ग्रासलेले आहेत. आपल्यानंतर मागे काय होईल, ही भीतीदेखील वाटत असल्याने मिळकतीमध्ये वाद नको म्हणून लोक मृत्युपत्र करून घेत आहेत.

-अॅड. विकास उथळे

कोट..

मृत्युपत्र हे माणूस जिवंत आहे, तोपर्यंत केवळ कागद असते. माणूस जिवंत असताना कुठल्याही वेळी ते बदलू शकतो. मुलांनी चांगला सांभाळ करावा या हेतूने देखील लोक मृत्युपत्र करतात. भविष्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होऊ नयेत, या हेतूने लोक मृत्युपत्र करू लागले आहेत.

अॅड. धनाजी शेलार

३) दुपटीने संख्या वाढली (बॉक्स)

कोरोनाआधी महिन्याकाठी मृत्युपत्र नोटरी करणाऱ्यांची संख्या ४० इतकी होती. आता मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार ती ७३ वर पोचली आहे.