शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

कवितांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:26 AM

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय राबविले जात असतानाच साताऱ्यातील संजय पातुरकर यांनी कवितांच्या माध्यमातून ...

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय राबविले जात असतानाच साताऱ्यातील संजय पातुरकर यांनी कवितांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी अनेक कविता रचल्या असून, सोशल मीडियाद्वारे त्यांची गेल्या वर्षभरापासून जनजागृती मोहीम सुरू आहे.

संजय पातुरकर यांचे मूळ गाव औरंगाबाद. एका संस्थेकडून साताऱ्यातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ पासून ते साताऱ्यात वास्तव्य करीत आहेत. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच पातुरकर यांनी कविता करण्याचा छंदही लीलया जोपासला आहे. त्यांचा ‘शब्दबंध’ कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी कसोटीचा होता. अशा काळात संजय पातुरकर यांच्या कवितांंनी जनतेला मानसिक आधार दिला. आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय करायला हवं आणि काय नको याची जाणीवही करून दिली.

‘कोरोनाचा उद्रेक आता पुन्हा पाहवत नाही. अनुभवातून आम्ही शहाणे होत नाही, पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. ही म्हणही आम्ही पचवत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवले आहे. ‘बेसावध राहणे हे भूषण नाही.. बेफिकीर आम्ही सदैव तमा बाळगत नाही.. मास्क, सॅनिटायझर आम्ही सदैव बाळगत नाही.. कोरोना संपविण्याचा आम्ही विचारच करीत नाही,’ असे सांगत पातुरकर यांनी कोरोनो हद्दपार करण्यासाठी आता निष्काळजीपणा सोडा, असे आवाहनही केले आहे.

(कोट)

आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न मी पूर्वीपासूनच करीत आहे. कोरोनाकाळात नागरिक निष्काळजीपणे वागत होते. अशा नागरिकांना आपण कुठे चुकतोय व आपण काय करायला हवं, हे कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.

- संजय पातुरकर, सातारा

फोटो : ०१ संजय पातुरकर