शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा : तारळीतून पाणी सोडणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:17 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठातारळीतून पाणी सोडणे बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर असून पायथा वीजगृहसह दरवाजातून ११ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा आहे. तर तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा सतत पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला होऊन धरणेही लवकर भरली. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर धरणात २३६५४ क्युसेक पाण्याची आवक होत होती. सकाळी साडे नऊपासून धरणाचे सहा दरवाजे एक फुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ९२१४ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा ११३१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धोम धरणात १२.९५ टीएमसी साठा असून ७२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कण्हेरमधून ५७४, बलकवडी धरणातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात ९.८४ टीएमसी साठा असून ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर तारळी धरणात ८०० क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर