शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

पावसाने दडी मारल्याने पिके लागली सुकायला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:24 AM

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागातील पिके सुकू लागली आहेत. ...

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागातील पिके सुकू लागली आहेत. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

खरिपातील पेरण्या पूर्ण होऊन पिकांची दुसरी कोळपणी सुरू झाली आहे. पिके जोमदार आली आहेत. पण सध्या पिकाला पावसाची गरज आहे. पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस पडला नाही. तर खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून पाणी देण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पाणी देण्याची सोय नसल्याने पावसाअभावी चिंता वाढली आहे.

इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र या विभागात जादा आहे. भूईमूग, घेवडा, उडीद, मका, चवळी आदी पिकांचा समावेश आहे. अंतवडी, रिसवड, शाहापूर, वडोली निळेश्वर, वाघेरी, करवडी, मेरवेवाडी, पाचूंद आदी विभागासाह इतर गावांचा समावेश कऱ्हाड उत्तरमधील पूर्वेकडील विभागात होतो. या विभागाला काही अंशी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या दोन वर्षांपासून पाण्याची सोय होत असल्याने बागायती शेती शेतकरी करू लागले आहेत. जिरायती क्षेत्र अजून जादा असल्याने येथील शेती पावसावर अवलंबून असते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट

ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी पाटपाणी देण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी तुषार सिंचनाच्या साह्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. जर येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम वाया जाऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

फोटो ०४कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाअभावी पिके सुकून चालली आहेत. (छाया : शंकर पोळ)