शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:32 PM

यशकथा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

- संतोष धुमाळ ( सातारा) 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोनके येथील प्रयोगशील शेतकरी भिकू धुमाळ. त्यांनी आपल्या माळरानावर जैविक खताचा वापर करून सीताफळाची बाग फुलविली आहे. तसेच यामध्ये घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. 

अलीकडील काळात पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून, शेतकीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. तोट्यातील शेती, मजुरांचा तुटवडा, पिकांवरील रोगराई आदी कारणांमुळे शेती क्षेत्रात गंभीर परिणाम होत आहेत. मुंबई येथील नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन सातारा जिल्ह्यातील भिकू धुमाळ यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. जून २०१६ मध्ये त्यांनी वाठार स्टेशनचे कृषी सहायक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या फळ पीक लागवड योजनेंतर्गत आपल्या ६० गुंठे क्षेत्रावर बाळानगरी या जातीच्या जवळपास २०० झाडांचे नियोजन केले. यात ५, ७, ५ मीटर अंतरावर खड्डे काढून त्यात शेण व जैविक खतांचा भरणा केला. तत्पूर्वी त्यांनी बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतात कूपनलिका खोदली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करून सीताफळाची लागवड केली.

ही बाग पूर्णत: जैविक खतांवर जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला. यासाठी लागवडीनंतर जीवामृत व इतर जैविक खते त्यांनी स्वत:च शेतात बनविली. यामुळे त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला. लागवडीनंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर झाडांची छाटणी करून घेतली. 

झाडे लावल्यापासून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रातून घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. गतवर्षीच्या हंगामात पहिलाच बहर असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी चांगल्या दरामुळे इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पीक अधिक फायद्याचे ठरले. शाश्वत उत्पादन व आजाराला बळी न पडणारे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाची सध्या परिसरात लागवड होत असून, डाळिंब व द्राक्षबाग पिकविणारा भाग आता सीताफळ उत्पादनातही आपली ओळख निर्माण करीत आहे. 

इतर फळबागांच्या तुलनेत सीताफळाचा भांडवली खर्च कमी आहे. सीताफळ हे कोणत्याही रोगाला बळी पडत नसल्याने त्यावर औषधाचा खर्चदेखील अगदीच नगण्य असतो. याउलट ऐन हंगामात देखील सीताफळाला किमान बाजारभाव ७० ते १५० रुपये प्रति किलो असा मिळतो. अल्पावधीतच आपली चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ टिकविणाऱ्या या फळाला नागरिकांकडून मागणी वाढली आहे. रबडी, आइस्क्रीमसारख्या पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर होत असल्याने सीताफळाची मागणी वाढल्याची माहिती शेतकरी भिकू धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी