शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

नरवणेत वारे अन् पावसामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:37 AM

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील नरवणे येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा आणि वळवाच्या पावसामध्ये ...

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील नरवणे येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा आणि वळवाच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये चिकू, आंबा बागा, तसेच कांद्याचेही नुकसान झाले, तसेच मका, कडवळ पीक भुईसपाट झाले आहे.

नरवणे व परिसराला शनिवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने चांगलाचा तडाखा दिला. यामध्ये अनिल रघुनाथ काटकर यांच्या आंबा व चिकू बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, संजय बाळासाहेब काटकर यांची आंब्यांची ४० झाडे आहेत. या झाडांना नुकतेच लागलेले आंबे तुटून खाली पडले. त्याचबरोबर, इतरही आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. फळांनी आंब्याची झाडे लगडलेली असतानाच वळावाच्या पावसात नुकसान झाले आहे. त्यामुळे पडलेल्या या फळांचं करायचं काय, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर मका, कडवळ यासारखी उन्हाळी पिके भुईसपाट झाली आहेत. काही शेतकऱ्यांचा कांदा अजूनही शेतात आहे. पावसात कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागा आणि पिकांची भुईसपाट झालेली दशा पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिसकावून घेतल्याने निराशेचे वातावरण आहे. नुकसानीची दखल शासनाने संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशीच मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

चाैकट :

वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. यापूर्वीही अशाच पद्धतीने जोराचा पाऊस आला होता. त्यावेळी शंकर हनुमंत काटकर यांचे अंदाजे ६० हजार रुपयांचे बाजरी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचीही दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही.

कोट :

वळवाच्या पावसामध्ये नरवणे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना योग्य ती मदत तत्काळ मिळावी, तरच शेतकऱ्यांना आत्मविश्वास परत मिळेल, यासाठी प्रामुख्याने शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

- दत्तात्रय काटकर, सरपंच नरवणे

फोटो ओळ : नरवणे, ता.माण येथील अंकुश काटकर यांच्या आंब्याच्या बागेचे वारा आणि पावसाने मोठे नुकसान झाले आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)