शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

कोरोना काळात सर्वत्र अंधार... आजीबाईचा बटवा देतोय आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:38 AM

सातारा : कोरोना काळात होणारा त्रास आणि कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेता हा त्रास आपल्याला होऊच नये, यासाठी प्रयत्न ...

सातारा : कोरोना काळात होणारा त्रास आणि कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेता हा त्रास आपल्याला होऊच नये, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. कोविड काळात सर्वत्रच औषधांचा आणि बेडचा काळाबाजार असल्याने सामान्य हादरून गेले आहेत. अशी परिस्थिती आपल्यावर उदभवू नये म्हणून सर्वत्रच काळजी घेतली जात आहे. या काळात सर्वत्र अंधार दिसत असताना आजीबाईचा बटवा मात्र सर्वांना आधार देत आहे. संक्रमण काळात आयुर्वेदावरचा विश्वास वाढला असून, घरगुती काढे उपयुक्त ठरत आहेत.

कोरोनाशी लढा देण्यासाठी अवघं जग आपापल्या परिनं पाऊल उचलत आहे. आरोग्य यंत्रणेच्या जोडीला गावोगावी अनेक ठिकाणी आयुर्वेदाची कास धरू लागल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे. सकाळी उठल्यानंतर कोणी देशी गाईचं गोमूत्र पितो, तर कोण मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करतो. हे चित्र आता ग्रामीण भागात सर्वत्रच पहायला मिळत आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून मिठाचे पाणीही पितात. गुळवेलचा काढा अनेकांना लाभदायक असल्याचे मानले जात आहे. या काळात अनेकांनी साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती दिली आहे. देशी गाईच्या दुधात हळद, लवंग, मिरेपुड टाकून पिण्यावरही भर दिला जात आहे.

सामान्य बाबींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येऊ नये म्हणून आजीबाईचा बटवा, ही प्रचलित परंपरा आहे. काळाच्या ओघात ही परंपरा लय पावली; मात्र कोरोना संक्रमणामुळे आजीबाईचा बटवा पुनरुज्जीवित झाल्याचे दिसत आहे. विशेषत: पूर्ण संरक्षण म्हणून कोरोना काळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदावर आधारित आजीबाईचा बटवा अनेकांना आधार ठरल्याचे दिसते.

कोट

कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचाराचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिद्ध करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पद्धतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.

- वैद्य संतोष महाडिक, सातारा.

गुळवेल सर्वाधिक उपयुक्त

निंबाच्या झाडाला वेटोळा घालत वरती जाणारा वेल म्हणजे गुळवेल. अनेक वर्षांपासून शेतात अनेक झाडांवर असलेली ही अमृतवेली औषधासाठी वापरली जाते, हे ज्ञात नव्हते; पण कोरोनाच्या काळात गुळवेलचे महत्त्व अधोरेखित झाले. गुळवेलच्या कांड्या, निंबाच्या कांड्या, तुळशीची पाने, जांभळीची कोवळी पाने आणि आले एकत्रीत बारीक करून ते रात्रभर पाण्यात टाकून सकाळी शिजवून घ्यायचे. त्यानंतर चाळणीने गाळून हे पाणी बाटलीत ठेवून रोज त्याचे सेवन करणं उपयुक्त ठरते.

- शकुंतला बाबर, पंताचा गोट

प्रतिकारशक्तीला बळ द्या

आले व हळद कुसकरून घेतले की ठसका उतरतो आणि खोकला बंद होतो. जिरा व कलमीचे उकळून घेतलेले पाणी पिले तर ज्वर शांत व्हायला मदत होते. हे उपचार पुढच्या पिढीपर्यंत गेले, त्याचे कारण म्हणजे आजीबाईचा बटवा हेच आहे; मात्र हे उपचार घ्यायला अनेक जण कचरतात. डॉक्टरांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आजीबाई अडगळीत पडली होती, आता कोविडमुळे पुन्हा एकदा ती मुख्य प्रवाहात आली.

- सईदा पठाण, बुधवार नाका

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आजीबाईचा बटवा उत्तम आहे. पूर्वी कोणालाही काही त्रास वाटला की घरातील ज्येष्ठ मंडळी प्रामुख्याने आजी काहीना काही घरगुती उपचार करून स्वस्थ करते. कोरोनामुळे आजीबाईच्या बटव्याची आठवण होत आहे. हळद, मिरे, लसूण, तुळस, मेथी, जिरे, हिंग, धने अशा अनेक औषधांचा वापर आजीबाईच्या बटव्यात होतो. संसर्गजन्य आजारात घटलेली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा वापर होतो; मात्र आजाराची लक्षणे वेळीच थांबत नसतील तर वेळ न घालवता वैद्यांशी बोलणं आवश्यक आहे.

- प्रभावती मोरे, शाहूपुरी.

कशाचा काय फायदा

शेणाच्या गोवरीच्या विस्तवावर हळद व ओवा टाकून त्याचा धूर करून जोरात श्वास घेतल्याने तो फुफ्फुसापर्यंत ओढला जातो

हुलग्याचे मांडगे खाल्ले तर मधुमेह असलेल्यांना चांगला फायदा होतो.

कोमट पाण्यात मीठ व हळद टाकून त्याच्या गुळण्या केल्याने घशातील विषाक्त पदार्थ तत्काळ निघून जातात. घशातील जडपणा कमी होतो आणि घसा मोकळा होतो

मिठाच्या गुळण्या अनेकांना माहीत होत्या. कोविड काळात त्यात हळदीचा केलेला समावेश उपयुक्त ठरत आहे.

पॉईंटर

दोन ऋतुंमधील पर्यावरणीय हवापालट असल्याने मानवी शरीर हा बदल चटकन स्वीकारत नसते, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप याचा त्रास होतो. अशा वेळी आजीबाईचा बटवा उपयोगी ठरतो.

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण :

कोरोनामुक्त झालेले रुग्ण :

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १ लाख ५३ हजार ५०६

कोरोना मृत्यू : ३ हजार ४८९