शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

By नितीन काळेल | Published: April 25, 2023 11:25 AM

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा

सातारा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगारांसाठी मुकादमांना उचल देऊनही टोळ्या न देता परस्पर पैसे लाटण्याच्या घटना दोन वर्षात वाढल्या असून, जिल्ह्यात अशी १ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. या माध्यमातून मुकादमांनी वाहतूकदारांना सुमारे ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे उसाला कोयता लावण्यासाठी टोळ्या लूट करत आहेत.राज्याचा डोलारा कृषी आणि सहकारावर उभा आहे. साखर कारखान्यामुळे तर अनेक कुटुंबांना आधार मिळालाय. या माध्यमातून वर्षातील सहा महिने तरी अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळतोय. पण, यामध्येही आता अनिष्ट गोष्टी घडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांची लूट होत आहे. तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना फसविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा गंडा गरीब वाहनधारकांना बसलाय. सातारा जिल्ह्यात हा आकडा सतत वाढतच चालला आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत साखर कारखाने करार करून ऊसतोडणी कामगार आणत असत. यासाठी मुकादम ही व्यवस्था होतीच. यामध्ये मुकादमांना उचल देणे, ने-आणण्याची जबाबदारी कारखाना प्रशासन पाहत होते. पण, गेल्या काही वर्षांत कारखान्यांनी ही जबाबदारी ढकलली आहे. आता कारखाना प्रशासन वाहनधारकांशी करार करते. त्यासाठी कारखान्याकडून वाहनधारकांना रक्कम देण्यात येते. यातून वाहनधारकाने मुकादमाला भेटून ऊस तोडणीसाठी टोळ्यांची जबाबदारी घ्यायची. त्यासाठी टोळ्यांना पैसेही देण्यात येत आहेत.म्हणजे वाहनधारकच पैसे देण्यापासून टोळ्या आणणे-नेण्याची जबाबदारी घेत आहेत. पण, आगाऊ उचल घेऊनही टोळ्या येत नाहीत. तसेच काहीवेळा टोळ्या आल्या तरी काही दिवस काम करतात आणि परत पळून जातात. यामुळे वाहनधारकांनाच याचा फटका बसत आहे. कारण, कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा बसतो.सातारा जिल्ह्यात मागील दोन वर्षात टोळ्यांनी फसविल्याची सुमारे १ हजार २०० प्रकरणे घडली आहेत. या टोळ्यांनी वाहनधारकांना ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारक रस्त्यावर आले आहेत. कारखान्याशी करार करणारे वाहनधारक हे गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. कर्ज घेऊन वाहन खरेदी आणि हप्ते भरून नाकीनऊ आले असताना या टोळ्या व मुकादमांकडून गंडा घातला जात आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विडा उचलला आहे. आता शासन दरबारी यावर काही मार्ग निघणार का, हाच आता प्रश्न आहे.दरम्यान, टोळ्या तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना गंडा घातला जातो. तसेच ऊसतोड मजूर हे उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पैसे घेतात. एक एकर ऊसतोडीसाठी ५ ते १० हजार रुपये घेतले जातात. यातून शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रकार होतो. हे दुष्टचक्र काेणीही थांबवत नाही.टोळीची स्थिती...

  • एक टोळीत ५ ते १० जोड्या असतात. त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
  • एक टोळी हंगामासाठी ५ ते १० लाख रुपये घेते.
  • टोळीसाठी मुकादमाचा रोल महत्त्वाचा.
  • एक टोळी दिवसाला क्षमतेनुसार अर्धा ते एक एकर क्षेत्रातील ऊसतोडणी करते.
  • कारखान्याच्या क्रशिंग क्षमतेवर टोळ्या ठरतात. साधारणपणे एका कारखान्यासाठी २५० ते ३०० टोळ्या हंगामात लागतात.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीFarmerशेतकरी