शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय चुकीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:35 AM

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक ...

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आहे. मात्र, कोरोनाच्या काळात घेतलेल्या मासिक सभेला नसल्याचे कारण देत उपस्थित विद्यमान संचालकांनी माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, त्यांच्या मनमानी कारभाराचा हा उत्तम नमुना आहे. याविरोधात योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचे मत पतपेढीचे संचालक राहुल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल वर्षभरापूर्वीच संपलेला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान, संस्थेच्या एकूण १५ संचालकांपैकी सध्या पाच संचालक पदे रिक्त आहेत. यापैकी एका संचालकांचा मृत्यू झाला आहे तर दोन संचालकांनी सेवानिवृत्तीमुळे राजीनामे दिले आहेत. इतर दोन संचालकांनी स्वच्छेने राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सध्या संस्थेचा कारभार दहा संचालकांवर व अध्यक्षांविना सुरू आहे.

वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या मासिक व वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तशाच पद्धतीने आमच्या संस्थेची सभा आयोजित करावी, असे मी वारंवार तोंडी व भ्रमणध्वनीवरून संस्थेचे उपाध्यक्ष यांना सांगितले होते. मी कऱ्हाड कोषागार कार्यालयात कार्यरत आहे. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. अशावेळी मला कऱ्हाड ते सातारा प्रवास करून मासिक सभेला हजर राहणे शक्य नव्हते. याचा विचार न करता संबंधितांनी यातील दोन सभा सायंकाळी सहानंतर प्रत्यक्ष आयोजित केल्या होत्या. कोरोनाच्या काळात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन गर्दी करायची नाही तसेच वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे मी मासिक सभांना हजर राहिलो नाही. सलग तीन मासिक सभांना हजर नसल्याचे कारण देत त्यांनी मला तिसऱ्या सभेनंतर कोरम पूर्ण नसताना संचालकपद रद्द केल्याचे पत्र पाठवले आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे. संस्थेला गेले पाच महिने अध्यक्ष नसताना त्यांच्या शिक्क्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. चेअरमन यांच्या सहीने मला पत्र पाठवले आहे. वास्तविक माझे संचालकपद रद्द करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का? असेल तर त्यांनी प्रथमत: मला तुमचे संचालकपद रद्द का? करू नये? अशी नोटीस देणे आवश्यक होते. म्हणजे मला माझी बाजू मांडता आली असती. नाहीतर तसा ठराव जिल्हा निबंधक, सातारा यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. त्यावर निबंधकांनी योग्य तो निर्णय घेतला असता. मात्र, असे न करता त्यांनी मला थेट तुमचे संचालकपद रद्द केले आहे, असे पत्र पाठवले आहे. माझे संचालकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याबाबत योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.