शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Lok Sabha Election 2019 घराण्यासाठी वाद थांबविण्याचा निर्णय: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:02 IST

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू ...

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाहीत. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलीन होऊ नये म्हणून हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया,’ असे आवाहन आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ सोनगाव, ता. सातारा येथे आयोजित शेंद्र्रे व परळी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उदयनराजे भोसले, सारंग पाटील, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, कमल जाधव, वनिता पोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘उरमोडीचे धरण झाले आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरितक्रांती घडेल. मात्र त्यासाठी आघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खूश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशात हुकूमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.’हे नाणं ओरिजनल आहे.. उदयनराजे‘निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात, त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिजनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक