शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘लोकशाही,’ ‘जनशक्तीवर’ काका बरसले !

By admin | Published: November 15, 2016 11:55 PM

नागरी विकास आघाडीचा प्रचारास प्रारंभ : सत्ताधाऱ्यांनी पालिका ओरबडून खाल्ली; कमानी उभारून विकास होत नाही अशीही उडवली खिल्ली

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात नगरपालिकेचे वारे वाहू लागल्यानंतर माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी पालिकेच्या राजकारणात सगळ्यात आधी कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आणि निवडणूक झाल्यानंतर पहिली प्रचारसभाही त्यांनीच घेतली. फरक फक्त एवढाच पत्रकार परिषदेला डॉ. सुरेश भोसले नव्हते आणि सभेला मात्र त्यांची उपस्थिती आवर्जून होती. सोमवारी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यसैनिकांचा परिसर म्हणून परिचित असणाऱ्या आझाद चौकात नागरी शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात उंडाळकरांनी पुण्याचा संदर्भ देत नागरी विकास आघाडी का स्थापन केली? हेच स्पष्ट करत सत्ताधारी लोकशाही आघाडीबरोबर प्रस्थापित जनशक्ती आघाड्यांवर चांगलेच बरसले. मंगळवार पेठ आणि पाटण कॉलनीतील सत्ता केंद्रांवर त्यांनी सडकून टीका केली. ‘माझ्या हातात देण्यासाठी शहरातील निवडणुकींना जे लागतं त्यातलं काही नाही. माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी भरपूर वेळ आहे. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, या शहराचे रूप बदलण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन,’ असे त्यांनी यावेळी सांगितले. नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तनाच्या लढाईला सुरुवात करीत आहोत. मतदारांनी घाबरून जाऊ नये. मतपेटीतून क्रांती करण्याची हीच वेळ आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. सामाजिक, आर्थिक परिर्वतन घडवून आणले; पण त्यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या मंडळींनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहे. कऱ्हाडचा घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. मी आमदार असताना पंचवीस एकर जमीन यासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, ती हातची जमीन सत्ताधाऱ्यांनी घालवली. त्याला विरोधकांनीही हातभार लावल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. म्हणून आज बाराडबरीमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. मुजावर कॉलनीमध्ये निधी टाकणारा मी पहिला आमदार आहे. खचलेल्या, पिचलेल्या जनतेला मी शहरात आणण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल होते; पण त्यानंतरच्या निवडणुकीत तेथील जनतेने मला मते दिली नाहीत, अशी खंत बोलून दाखवायलाही ते विसरले नाहीत. धनिक लोकांच्या तालावर लोकशाही नाचता कामा नये, ही भूमिका आपण पहिल्यापासूनच घेतली आहे. पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात काढले. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून काम पाहिले. मंत्री झालो; पण निवडणुका लागल्यावर अशा सहा महिन्यांत निधी टाकण्याची आणि विकासकामे करण्याची घाईगडबड कधी केली नाही आणि जात, पात, धर्म याला कधीही थारा न देता आपण काम केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी) चेहरा बदलला प्रवृत्ती कुठे? लोकशाहीच्या नावाखाली शहरात हुकूमशाही करणाऱ्या एका आघाडीने पाच वर्षांत विकासाचे एकही काम मार्गी लावले नाही. तुझे ठेकेदार कोण? माझे ठेकेदार कोण?, तुझी टक्केवारी किती?, माझी टक्केवारी किती? यांनी स्वत: ची घरे भरली आणि आता बदनाम झालो म्हणून एक सोडून दुसरा चेहरा घरातीलच बाहेर काढला. चेहरा बदलला असला तरी प्रवृत्ती बदलली आहे का? याचा कऱ्हाडकरांनी शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एवढ्यात नवे शहर वसले असते ! यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यावेळी म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांकडे रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदी प्रश्नांची उत्तरे नाहीत. तर दुसरी आघाडी आम्ही शंभर कोटी निधी दिला याचे तुणतुणे वाजवित आहेत; पण विकास काहीच झालेला दिसत नाही. खरेतर एवढ्या पैशात नवे शहर वसले असते,’ असा टोला लगावला. शंभर कोटी गेले कुठे ? सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावावरती शंभर कोटी हडप केल्याचा आरोप उंडाळकरांनी यावेळी केला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते शंभर कोटी विकासासाठी मी आणल्याचे सांगत असले तरी त्यावेळी विधीमंडळात मी आमदार म्हणून उपस्थित होतो. त्यामुळे हे पैसे गेले कुठे? हे विचारण्याचा मला नैतिक अधिकार आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली गळा घोटण्याचे काम केल्याचे उंडाळकर म्हणाले.