शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शिवसह्याद्री पायदळाची ऐतिहासिक झेप; भारावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:31 IST

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर

ठळक मुद्देसिंहगड ते रायगड दरम्यानच्या रानवाटा पादाक्रांत चाळीस मावळे सहभागी :

खंडाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सह्याद्रीच्या डोंगररांगातील कडेकपारी, घनदाट अरण्य आणि बळकट गड किल्ल्यातून विस्तारले. शिवरायांचा हाच ठेवा प्रत्यक्ष पाहण्याचा ध्यास घेऊन इतिहासाचा वारसा जपण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने ऐतिहासिक झेप घेतली. सिंहगड-राजगड-तोरणा-बोराट्याची नाळ-रायगड असा तब्बल ८२ किलोमीटरच्या रानवाटा तीन दिवसांत पादाक्रांत करीत स्वच्छता मोहीम राबविली.

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर गावाकडे उतरले. विंझर ते गुंजवणी पायी प्रवास व पुढे राजगड चढाई करून संजीवनी माचीवरून पालखिंडीत उतरून ३२ किलोमीटरच्या अथक प्रवासानंतर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पाल खिंड ते बुधला माचीवरून तोरणा किल्ला व पुढे कानंद खिंडीत उतरून गेळवणी मार्गे मोहरी गावात सुमारे २६ किलोमीटरचा प्रवास करून मुक्काम करण्यात आला.

तिस-या दिवशी मोहरी ते रायलिंग पठार, बोराट्याची नाळ, लिंगाणा किल्ल्याला वळसा घालून पाणेगाव दरीतून उतरून पुढे रायगडवाडी मार्गे रायगड किल्ला चढाई केली. त्यानंतर चित्त दरवाजाने खाली येणे हा सुमारे २४ किलोमीटरचा प्रवास अतिशय दिमतीने पूर्ण केला .

तीन दिवसांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे अंतर असल्याने अंतिम टप्प्यात काहींच्या पायांना फोड तर गुडघ्यांना चमक असताना छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनाची आस बाळगून मोठ्या जिद्दीने हा ट्रेक सदस्यांनी पूर्ण केला. त्यानंतरही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ध्यास स्वच्छतेचा .....गडकोट ट्रेकिंगमधून प्रत्येक गडावर या ग्रुपच्या माध्यमातून सफाई मोहीम राबवली जाते. गडावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व इतर कचरा जमा करून तो मोठ्या पिशव्यातून भरून गडाखाली आणला. त्याची योग्य निचरा केला जातो. त्यामुळे स्वच्छतेचा ध्यास घेऊन केलेल्या कामामुळे किल्ल्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते. 

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव मनामध्ये राहावी तसेच गडकिल्ल्यांची स्वच्छता राहावी, यासाठी ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले जाते. याबरोबर शारीरिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या धावपळीतून वेगळं काही केल्याचा आनंदही मिळतो.- श्रीपाद जाधव, संस्थापक शिवसह्याद्र्री पायदळ ट्रेकर्स

 

टॅग्स :Trekkingट्रेकिंगsinhagad fortसिंहगड किल्ला