शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Satara: धोम-बलकवडी धरणाने तळ गाठला, गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे दर्शन तब्बल चोवीस वर्षांनंतर घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:52 IST

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या ...

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या पोटात गाडल्या गेलेल्या गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे तब्बल चोवीस वर्षांनी दर्शन घडले आहे. श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाल्याने नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. वाई तालुक्यातील धोम व धोम बलकवडी धरणातही यंदा अल्प पाणीसाठा होता. बलकवडी धरणाची निर्मिती १९९५ मध्ये झाली. यावेळी धरणाच्या निर्मितीत योगदान देणारे गोळेगाव, गोळेवाडी हे गाव व गावातील पुरातन मंदिरे धरणात गाडली गेली.

तब्बल चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धरणातील पाण्याने तळ गाठला अन् धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहास पुन्हा दृष्टिक्षेपात पडला. धरणात श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाले असून, काही इतिहासप्रेमी संस्था तसेच तरुणांकडून या मंदिरांमधील गाळही काढण्यात आला आहे. ही पुरातन मंदिरे नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरली असून, हा इतिहास पाहण्यासाठी नागरिकांची पावले धरणाकडे वळू लागली आहेत.

प्राचीन मंदिराचा हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर सरकारने अशा मंदिरांचे स्थलांतर करून पुरातत्त्व विभागामार्फत त्याने संवर्धन करायला हवे. या वास्तू हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. - रोहित मुंगसे, इतिहास अभ्यासक 

वाईतील भटकंती सह्याद्रीची परिवार गेली सहा वर्षे वाई परिसरात संशोधन करत आहे. संस्थेने मागील काही वर्षेच बऱ्याच अज्ञातस्थळांचे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. बलकवडी धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहासही अभ्यासानंतर दृष्टिक्षेपात आणला जाईल. - सौरभ जाधव, सदस्य भटकंती सह्याद्रीची परिवार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणTempleमंदिर