शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

बिबट्याच्या भीतीने ‘सातच्या आत घरात’!

By admin | Published: October 06, 2016 11:40 PM

उरूलमध्ये दहशत : शिवारात जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती

मल्हारपेठ : गेल्या महिन्यापासून उरूल घाटासह डोंगर भागातील वाड्या-वस्तीवर बिबट्याची दहशत सुरू असून, तांबेवाडी-ठोमसे रस्ता व उरूल घाटात वारंवार दर्शन होत आहे. सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतात जाण्यास शेतमजूर, शेतकरी, महिला घाबरत आहेत. उरूल भागातील कुत्र्यांची संख्या महिनाभरात घटल्याने रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना कुटुंबांनी नोकरीस असणाऱ्या सदस्यांना दिल्या आहेत. वन विभागास माहिती देऊन ही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्यातून होत आहे.महिन्यापूर्वी उंब्रज-पाटण मार्गावरील उरूल घाटात बिबट्याचे दर्शन झाले. ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागे बिबट्या लागत होता. त्या दिवसापासून दोन बिबट्यांचा वावर उरूल, ठोमसे भागातील जुगाई माळ, लाठ्यांचा माळ, मल्हारपेठ जवळील गवळण दरा, देसाई शेत व उरूल घाटात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे उरूल भागातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत माजली असून, गेल्या महिन्यापासून शेतातही दोघे, तिघेजण जात आहेत. जनावरे उघड्यावर न बांधता शेडात बांधत आहेत. तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या मंडळींना रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झाली असून, बिबट्यानेच त्यांचा फडशा पाडला असावा, असा अंदाज ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून आलेले उरूलचे ग्रामस्थ बापू चव्हाण यांना उरूल घाटात बिबट्या मृत जनावर खात असल्याचे दिसले. त्यानंतर उरूल बस थांब्यावर असणाऱ्या सागर देशमुख, महेश निकम व मनोज चव्हाण यांनीही खात्री केली. बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे भागात पसरत असून, खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्ये काढण्याची सुगी चालू असल्याने शेतकरी, महिला व शेतमजूर शिवारात जाण्यास भीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागास माहिती देऊनही बघतो, येतो की, लोकांनी काळजी घ्यावी अशी उत्तरे ऐकण्यास मिळत आहेत. पाळीव जनावरे किंंवा एखाद्या मनुष्यावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उरूल भागातील ठोमसे, पोळाचीवाडी, तांबेवाडी, गणेवाडी, बोडकेवाडी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)दुचाकीस्वारांचा जीव मुठीतकाही दिवसांपूर्वी उरूल घाटात उंब्रज-पाटण मार्गानजीक बिबट्या ठाण मांडून बसला होता. या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचाही त्याने पाठलाग केला. त्यामुळे त्यावेळी घाटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजही तेथे हिच परिस्थिती असून, घाटातून मार्गस्थ होताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरूनच जावे लागत आहेत.