शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

By सचिन काकडे | Published: April 26, 2023 3:28 PM

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सलग तीन आठवडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी बुधवारी सकाळी पालिकेत येऊन बोंबाबोंब आंदोलन केले. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास सहा मे रोजी अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजू, असा इशारा यावेळी नगर विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.गेल्या महिनाभरापासून सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातचशहराच्या पश्चिम भागात वारंवार गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.वारंवार सूचना, निवेदने देऊन पाणीपुरवठ्यात कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी नगर विकास आघाडीचे माजी नगरसेवक अविनाश कदम,  पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्यासह रामाचा गोट, मंगळवार पेठ, होलार गल्ली भागातील नागरिकांनी पालिकेत  मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली.यावेळी शहर अभियंता दिलीप चित्रे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, फिल्टर बेडची स्वच्छता केल्यानंतर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावी लागते. या पावडरमुळे पाण्याचा रंग काहीसा पिवळसर होतो. याचा अर्थ ते पाणी दूषित आहे असे नाही. असे सांगत त्यांनी समोरच्या बाटलीतील पिवळसर पाणी नागरिकांना पिऊनच दाखवले. यानंतर नागरिकांचा विरोध शांत झाला.दरम्यान, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा सहा मे रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा अविनाश कदम यांनी दिला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीagitationआंदोलन