शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

By admin | Published: February 27, 2017 11:34 PM

कऱ्हाडात घडतंय बिघडतंय : ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो..’

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली. दोन अंकी आकडाही गाठू न शकलेल्या काँगे्रस नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आलीय; पण या निकालानंतर कार्यकर्त्यांच्यात अन् सोशल मीडियावर अनेक चर्चांबरोबरच काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या बदलाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे; पण जिल्हाध्यक्ष बदलायचाच म्हटलं तर ज्यांचा याबाबतचा छुपा आग्रह होता त्यांच्या मतदार संघातही काँगे्रसची वाटच लागलीय. ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो...’ असंच प्रत्येक काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटतंय खरं; पण काँगे्रसचं हे दु:ख नेमकं कोण दूर करणार, हा खरा प्रश्न आहे.एकेकाळी सातारा जिल्हा हा काँगे्रसचा बालेकिल्ला होता म्हणे. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथे घड्याळाचा गजर वाढला. काँगे्रसच्या ‘हाता’ला एक-दोन विधानसभा मतदारसंघ लागले आहेत; पण तेथेही सध्या पक्षाची परिस्थिती चांगली दिसत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. सातारा जिल्हा हा दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा, दिवंगत किसन वीर आबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता अलीकडे तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय. खरंतर यशवंतराव अन् किसन वीर आबांचा वारसा सांगूनच पृथ्वीबाबा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले; पण धर्मनिरपेक्ष धोरणाचा त्यांच्याच जिल्ह्यात आज पुरता बोजवारा उडालेला दिसतोय. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर तर वाढतच चाललाय; पण भाजपचं ‘कमळ’ही काँगे्रसच्या बरोबरीत येऊन बसलंय.वास्तविक, यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कर्मभूमीत भाजपचा नगराध्यक्ष होतो त्याचवेळी जिल्ह्यातील काँगे्रसच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखायला हवी होती. चिंतन मेळावे घेऊन भाजपला रोखण्यासाठी व्यूहरचना करायला हवी होती. मात्र, मुंबई अन् दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. देशाच्या परमाणु धोरणावर चर्चा करणारे बाबा, देशाचे परराष्ट्र धोरण युनोत मांडणारे बाबा सध्या गल्लीतल्या राजकारणात अडकलेले दिसतात; पण त्यांना योग्य मार्ग सध्या सापडताना दिसेना. देश, विदेशातील प्रश्नांवर बोलून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले असावे.स्वातंत्र्यानंतर अगदी कालपरवापर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपचं चिन्ह कधी रुजलेलं पाहायला मिळालं नाही; पण आज काँगे्रसमधीलच सुंदोपसुंदीमुळे काँगे्रस कार्यकर्तेच काँगे्रस विचारापासून दूर गेल्याचे दिसले.आता चिंतन मेळावे, पराभवाचे परिमार्जन, विश्लेषण चालू होईल. त्यातून जिल्हाध्यक्ष बदलासारखा विषयही समोर येईल; पण जिल्ह्यात काँगे्रसची पूर्ण वाताहत झाली असताना ही नौका नेमकी कोणाच्या खांद्यावर पेलणार? कारण या निवडणुकांत एकाही काँग्रेस नेत्याचा खांदा मजबूत राहिल्याचे दिसत नाही. म्हणूनच तर ‘कोणी म्हटले म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझा निर्णय बाबा घेतील’ असे आनंदराव पाटील सांगताना दिसतात.जयाभाऊंचा ‘भाव’ उतरलाकाँगे्रसचा एक आक्रमक नेता म्हणून जिल्ह्यात माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेतले जायचे; पण मध्यंतरी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार झाला. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदार संघात झटका बसल्याने जयाभाऊंचा भाव सध्या उतरला आहे. जिल्ह्याचे नेते होऊ पाहणारे जयाभाऊ फक्त एका जिल्हा परिषद गटापुरतेच उरलेले दिसतात.मदनदादाही वरमलेवाईचे माजी आमदार आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे देखील जिल्ह्यातील राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते; पण आमदार मकरंद आबांनी त्यांना जेरीस आणले आहे. आमदारकी तर दूरच पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आबांनी दादांना घाईला आणलेय. त्यामुळे ते तरी जिल्ह्याची जबाबदारी कसे पेलणार असा प्रश्न आहे.