शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचं दिवाळं !

By admin | Published: October 24, 2016 12:41 AM

शेतकरी आर्थिक संकटात : उत्पादनही घटले; क्विंटलला अडीच हजार रुपये दर

कोपर्डे हवेली : गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय सोयाबीनचे बाजारपेठेतील दरही पडले असल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. जिरायती आणि बागायती शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी जादा पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पाणी शेतात साचून राहिल्याने कुजून गेले. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनाचा उतारा १४ क्विंटल होता. तर सध्या उतारा ५ ते ८ क्विंटल पडत आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. तर दीपावली काही दिवसांवर आल्याने खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करू लागले आहेत. दर नसल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. १४ फॅट असलेल्या सोयाबीनचा क्विंटलचा २ दोन हजार ७०० रुपये आहे. हेच दर ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ५० ते १०० रुपयांचा फरक दिसत आहे. हाच दर तीन ते चार महिन्यांपूर्वी ४ हजार ८०० पर्यंत होता. १७ फॅट असणाऱ्या सोयाबीनला क्विंटलमागे १५ ते १७ किलोची तूट धरून दर देत आहेत. वाळलेल्या सोयाबीनला दर चांगला भेटतो. दर चांगला मिळण्यासाठी फॅट चांगली लागते, असे कारण व्यापारी सांगत आहेत. दर कधी वाढतील हे सध्या सांगता येत नसल्याने आणि पैशाची गरज असल्याने अनेक शेतकरी सोयाबिनची विक्री करत आहेत. प्रत्येक दिवशी दर बदलत आहेत. काही शेतकरी विक्री करावी का नको, अशा दुहेरी विचारात आहेत. कित्येक वर्षे शासनाचे धोरण सोयाबीनच्या बाबतीत उदासीन असल्याने आणि दर कोण ठरवते, याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्यात संताप दिसून येत आहे. (वार्ताहर) सोयाबीन ठेवायचं की विकायचं ? दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने अनेक शेतकरी गरजेसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. तर उत्पादन घटल्याने सोयाबीन शेती तोट्यात गेली आहे. दरामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे विक्री करावी का नको, या मानसिकेत अनेक शेतकरी आहेत. काही शेतकरी उत्पादीत केलेले सोयाबीन घरीच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. ज्यावेळी दर वाढेल, त्यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा विचार आहे. दर कधी वाढेल हे सांगता येत नाही. पेंडची निर्यात घटल्याचा परिणाम... सोयाबीनचे गाळप होऊन त्यातून तयार झालेली पेंड निर्यात केली जाते. मात्र, सध्या सोयाबीनच्या पेंडची निर्यात घटली आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील पेंडची किंमत जास्त आहे. त्यामुळे ही निर्यात घटली असून, त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. पेंडची निर्यात जास्त झाल्यास दर वाढतो. मात्र, सध्या निर्यात कमी असल्याने सोयाबीनचा दर कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोयाबीनचे उत्पादन जगभर घेतले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे ३ हजार लाख टन सोयाबीन पिकते. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका १ हजार १०० लाख टन, अर्जंेटिना ६०० लाख टन, ब्राझील ९०० लाख टन, इतर राष्ट्रे ५०० लाख टनांपर्यंत या पिकाचे उत्पादन निघते. त्या तुलनेत भारतामध्ये फक्त ११० लाख टन सोयाबीन उत्पादीत होते.