शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

रेशनधान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:27 AM

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ...

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ७ हजार ५६८ कुटुंबांनी पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतला आहे.

रेशनिंग दुकानदारांबाबत लोकांच्या अनेक तक्रारी असतात. संबंधित दुकानदार ग्राहकांसोबत नीट व्यवहार करत नाही. अरेरावीची उत्तरे देतो, लोकांना हेलपाटे मारायला लावतो, अशा अनेक तक्रारी असतात. अनेकदा ग्राहक दुकानदारासोबत वाद घालतात. मात्र तरीही दुकानदाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर दुकानच बदलण्याचा विचार ग्राहक करतात. त्यातूनच दुकान बदलण्याचा निर्णय घेण्यात येतो.

सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दुकानांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागात कमी पण शहरी भागात दुकान बदलण्यासाठी पर्याय असतो, त्यामुळे नागरिक दुकानदाराशी वाद होत असेल तर दुकान बदलून शासनाच्या पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतात.

या व्यतिरिक्त कामानिमित्त गावे बदलावी लागणाऱ्या ग्राहकांनादेखील शासनातर्फे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनिंग ग्राहकांना धान्याचा लाभ दिला आहे. एप्रिल महिन्यात ७ हजार ३३, मे महिन्यात ७ हजार ५५७, जून महिन्यात ७ हजार ५६८ लोकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये रेशनिंग दुकानदाराशी वाद होत असल्याने दुकान बदलून धान्य घेणाऱ्यांचा समावेश आहे.

.............................असा मथळा आपल्याला करता येईल. सबहेडमध्ये किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला याचा उल्लेख करावा...................

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक -

बीपीएल -३,८२,१६४

अंत्योदय -२८२२०

एकूण - ४,१०, ३८४

किती जणांनी दुकानदार बदलला -

२) कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार (ग्राफ)

सातारा : ४

वाई : ३

कऱ्हाड : ७

माण : ३

खटाव : ४

कोरेगाव : ७

पाटण : ३

फलटण : ६

महाबळेश्वर : १

जावली : २

खंडाळा : ३

३) शहरात जास्त बदल

शहर परिसरात दुकानदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारासोबत पटत नसल्याने ग्राहक कंटाळून दुकानदारच बदलतात. लांब अंतर चालून जावे लागले तरी चालेल; परंतु दुकानदाराशी वाद होण्यापेक्षा ते परवडले, अशी लोकांची मानसिकता आहे.

४) नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

जिल्ह्यातील २८ हजार २८० कुटुंबांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे मोफत धान्य दिले जाणार आहे. शासनाने कोरोनाच्या काळात मोफत धान्य देऊन दिलासा दिला आहे.

फोटो : ०९पुरवठा