शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:26 AM

कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, ...

कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

यावेळी भीम आर्मीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष अनिकेत साळुंखे, शुभम पवार, शंतनू कुकडे, राहुल साळुंखे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. समाजातील प्रत्येक घटक या संकटाशी लढत आहे. संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गतवर्षी आणि यंदाही व्यापारी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे व्यवसाय कायमचे बंद पडले. शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतामध्ये पडून राहिल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. मात्र, तरीही प्रत्येकजण या संकटातून मार्ग काढत आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

गतवर्षापासून अनेकांची वीजबिले थकीत आहेत. सुरूवातीला ही बिले माफ केली जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यातून माघार घेत बिले भरावीच लागतील, असे सांगण्यात आले. त्यातही वाढीव मुदत देण्यात आली नाही. वीज कंपनीनेही वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा विचार करून वीज कंपनीने थकीत बिलापोटी ग्राहकांची कनेक्शन न तोडता बिले भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच टप्प्याटप्प्याने रक्कम स्वीकारावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.