शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
3
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
4
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
5
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
6
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
7
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
8
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
9
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
10
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
11
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
12
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
13
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
14
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली
15
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
16
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
17
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
18
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
19
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
20
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, टॅंकरची संख्या १०० च्या उंबरठ्यावर

By नितीन काळेल | Published: September 26, 2023 5:40 PM

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ ...

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टंचाई निवारणासाठी सध्या ९९ टॅंकर सुरू आहेत.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिमेकडेही पर्जन्यमान अपुरे झाले आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरलेली नाहीत. तर पूर्व भागात पावसाने डोळे वटारलेलेच असून आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला आहे. आगामी काही दिवसांत पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होणार आहे. अन्यथा पुढीलवर्षीच्या पावसाळ्याची वाट पहावी लागणार आहे. तर सध्यस्थितीत पाऊस नसल्याने पाच तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माण तालुक्यात अपुरे पर्जन्यमान आहे. त्यामुळे दुष्काळ वाढत चालला आहे. तसेच गावोगावच्या ओढ्यांना पाणी नाही. विहिरी आटल्या असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यामधील ५१ गावे आणि तब्बल ३७२ वाड्यांना टॅंकर सुरू आहे. यावर ८१ हजार ५१६ नागरिक आणि ६१ हजार ५१४ पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर माण तालुक्यातील लोकांसाठी ६४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, वरकुटे- म्हसवड, ढाकणी, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाड, विरळी, कुरणेवाडी आदीं गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.खटाव तालुक्यातीलही टॅंकरग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. २१ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. २९ हजार नागरिक आणि ८ हजार पशुधनासाठी २४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, तडवळे आदी गावांसाठी टॅंकर सुरू झाले आहेत. फलटण तालुक्यातही पाणीटंचाई वाढलेली आहे. १० गावे ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे १५ हजार नागरिक आणि १४ हजार ४९१ पशुधनाला या टॅंकरचा आधार आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

कोरेगाव तालुक्यातील १० गावांतील १५ हजार नागरिक आणि अडीच हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. तालुक्यातील टंचाई निवारणासाठी ८ टॅंकर धुरळा उडवत फिरत आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडीत टंचाई आहे. वाई तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर या दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. यावर २ हजार नागरिक आणि ४७५ पशुधन अवलंबून आहे. तर पाटण, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दीड लाख नागरिक, ८७ हजार पशुधन बाधित...

जिल्ह्यात सध्याही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. सध्या ९९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर १ लाख ४२ हजार २७७ नागरिक आणि ८७ हजार ३८४ पशुधन अवलंबून आहे. तर १९ विहिरी आणि ३४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. सध्या शासकीय ९ आणि खासगी ९९ टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी